Crude Oil In India : भारतात आत्तापर्यंत विविध धातूंच्या खाणी सापडलेल्या आहेत. सोने चांदी आणि इतर दुर्मिळ धातूंच्या खाणी देशात अस्तित्वात असून या खाणींमधून धातूंचे उत्खनन सुरू आहे. या खाणींमुळे खऱ्या अर्थाने भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
खाणींमधून निघणाऱ्या मौल्यवान धातूमुळे भारताचा एकात्मिक विकास सुनिश्चित होतोय. तर दुसरीकडे आता देशासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा सापडला आहे.

महाराष्ट्र नंतर आता अंदमान या केंद्रशासित प्रदेशातील समुद्रामध्ये हा तेलाचा साठा सापडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा कच्च्या तेलाचा साठा प्रचंड मोठा आहे आणि यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा मिळणार आहे.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही प्रचंड मोठी होणार आहे. महत्वाची बाब अशी की या साठ्यांची माहिती स्वतः केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.
अंदमानच्या समुद्रातील तेलाचा साठा किती मोठा आहे ?
जाणकारांकडून प्राप्त माहितीनुसार सध्या स्थितीला गयाना हा देश कच्च्या तेलाच्या साठ्याच्या बाबतीत 17 व्या क्रमांकावर आहे. गयाना मध्ये सुमारे 11.6 अब्ज बॅरल तेलाचा आणि वायूचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याच गयाना देशात असणाऱ्या कच्च्या तेलाच्या साठ्या एवढा साठा अंदमानच्या समुद्रात सापडला असल्याचा दावा करण्यात येतोय.
किती लिटर कच्चे तेल मिळणार
अंदमान मध्ये जो कच्चा तेलाचा साठा सापडला आहे तिथे 184,440 करोड़ लीटर कच्च्या तेलाचे भंडार असू शकते असा एक प्राथमिक अंदाज समोर आला आहे.
पण जर अंदमानमध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे भंडार आढळले, इथे गयानाएवढे तेलाचे साठे सापडले तर भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक बड्या अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाणार आहे.
सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून हिच 3.7 ट्रिलियन डॉलर भारतीय अर्थव्यवस्था या नव्याने सापडलेल्या तेलाच्या साठ्यांमुळे 20 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचू शकते.
नक्कीच भारताची अर्थव्यवस्था जर 20 ट्रिलियन डॉलरची झाली तर भारत विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाईल. देशातील विकासाला अधिक चालना मिळेल.