दीड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटात ! भारतातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात, विकसित होणार नवा मार्ग

भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आता आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. महाराष्ट्रात लवकरच एका नव्या महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू होणार असून याच महामार्ग प्रकल्प अंतर्गत राज्यात सर्वाधिक लांबीचा बोगदा विकसित केला जाणार असून आज आपण याच संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

India’s Longest Tunnel : भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आता आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. या नव्या बोगद्यामुळे दीड तासांचा प्रवास फक्त वीस मिनिटात शक्य होणार असा सुद्धा दावा केला जातोय. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाची जोरदार चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा महायुतीच्या अनेक ताकतवर नेत्यांना फटका बसला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर महायुतीकडून शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती.

मात्र आता महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर सरकारचा सूर बदलला आहे. प्रचंड विरोध असतानाही  नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तिपीठ महामार्गाचा सरकारकडून आग्रह धरला जात आहे.

हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत बनवला जाईल अशी सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसून येत आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासाठी आग्रही आहेत.

दरम्यान याच नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प अंतर्गत देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा विकसित होणार आहे. 

या जिल्ह्यात विकसित होणार देशातील सर्वाधिक लांब बोगदा

नागपूर – गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात देशातील सर्वात लांब बोगदा तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हा बोगदा आजरा ते बांदा दरम्यान आंबोळीजवळ बनवण्यात येणार अशी प्राथमिक माहिती आहे. खरेतर, या प्रकल्पाअंतर्गत दोन मोठे बोगदे बांधले जात असून, त्यांची एकूण लांबी सुमारे 29.9 किलोमीटर असणार आहे.

दरम्यान हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर 39 किलोमीटरचे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या हा 39 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतोय. 

या जिल्ह्यांमधून जाणार शक्तिपीठ महामार्ग 

शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग बनणार आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग मार्गे हा महामार्ग गोव्यापर्यंत जाईल. पत्रा देवी हे या महामार्गाचे शेवटचे ठिकाण असेल.

हा महामार्ग राज्यातील माहूर, तुळजापूर, औंढा नागनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, परळी वैजनाथ अशी प्रमुख शक्तिपीठे आणि धार्मिक स्थळे जोडणार आहे. म्हणजे या महामार्गामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!