Longest Tunnel : ‘हा’ आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा! इगतपुरी ते कसारा 10 मिनिटात करता येणार पार

महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून समृद्धी महामार्ग हा एक खूप महत्त्वाचा महामार्ग असून या महामार्गाला महाराष्ट्राचा विकासाचा महामार्ग म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्याला माहित आहे की हा महामार्ग नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा महामार्ग असून आतापर्यंत जवळजवळ या महामार्गाचा 625 किलोमीटरचा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.

Published on -

Longest Tunnel:- महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून समृद्धी महामार्ग हा एक खूप महत्त्वाचा महामार्ग असून या महामार्गाला महाराष्ट्राचा विकासाचा महामार्ग म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्याला माहित आहे की हा महामार्ग नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा महामार्ग असून आतापर्यंत जवळजवळ या महामार्गाचा 625 किलोमीटरचा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.

तसेच उर्वरित शहात्तर किलोमीटरचा महामार्ग जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा एक महत्वपूर्ण महामार्ग असून यामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 ला खुला करण्यात आला होता

व त्यानंतर 80 किलोमीटरचा शिर्डी ते भरविर हा 26 मे 2023 रोजी वाहतुकीसाठी खुला झाला होता. 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी हा मार्ग वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आला.

हा महामार्ग उभारताना अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे आणि चौथ्या टप्प्यातील इगतपुरी ते आमणे हे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

परंतु हा चौथा टप्पा अनेक कारणांनी खूप महत्त्वपूर्ण आणि आकर्षक असा आहे. हा अखेरचा टप्पा 76 किलोमीटरचा असून यावर पाच बोगदे आणि 16 पूल असणार आहेत.

 समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यावर आठ किमीचा बोगदा आहे विशेष आकर्षण

इगतपुरी ते आमणे हा समृद्धी महामार्गावरील शेवटचा टप्पा असून या महामार्गावर एक आठ किलोमीटरचा बोगदा आहे व या बोगदामुळे तुम्हाला प्रवास करताना कासारा घाटच लागणार नाही. सध्या कसारा घाटाचे अंतर बारा किलोमीटर आहे व ते पूर्ण करण्यासाठी जवळपास 40 मिनिटांचा कालावधी लागतो.

परंतु जेव्हा हा महामार्ग सुरू होईल तेव्हा बोगद्यातून प्रवास करत असताना आठ ते दहा मिनिटांमध्ये हे अंतर कापले जाणार आहे. समृद्धी महामार्गाचा हा चौथा टप्पा नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांना जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असून सह्याद्री डोंगर रांगांमधून हा मार्ग पूर्ण करण्यात आलेला आहे.

या महामार्गावरील पॅकेज 14 अंतर्गत आठ किमी चा हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा असून देशातील दुसरा सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. या बोगदयाची रुंदी 17.61 मीटर तर उंची 9.12 मीटर आहे. इगतपुरी ते कासार हे अंतर आठ ते दहा मिनिटात यामुळे पार करता येणे शक्य होणार आहे.

एवढेच नाही तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिकला जोडणाऱ्या कासारा घाटाला पर्यायी मार्ग झाल्यामुळे वाहतूक देखील जलद होणार आहे.

 समृद्धीचा हा अखेरचा टप्पा कामाच्या बाबतीत होता आव्हानात्मक

समृद्धी महामार्गाच्या या अखेरच्या टप्प्यामध्ये अनेक पूल बांधणे तसेच बोगदे बांधण्याचे काम सगळ्यात कठीण काम होते. बऱ्याच ठिकाणी तीस ते चाळीस मीटर पर्यंत खडकांमध्ये खोदकाम करावे लागले

व समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यांमध्ये सोळा वॅली पूल आहेत व पॅकेज 15 मध्ये खोल दरी असल्यामुळे जे पूल उभारण्यात आले त्या पुलाच्या खांबांची उंची 84 मीटर म्हणजेच 25 ते 28 मजली इमारती इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!