Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या आहेत. राज्यात पायाभूत सुविधांचे मोठमोठे प्रकल्प विकसित केले जात आहेत. रस्त्यांचे आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात पूर्ण झाले आहेत आणि अजूनही असे अनेक प्रकल्प आहेत ज्यांची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत.
अशातच महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा एक नवा रिंग रोड विकसित केला जाणार आहे.

या रिंग रोड बाबत गेल्या महिन्यात निर्णय घेण्यात आला असून आज आपण याच नव्या रिंग रोडची डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
गेल्या महिन्यात झाली मोठी घोषणा
गेल्या महिन्यात म्हणजेच मे 2025 मध्ये सरकारने गोव्याच्या बाहेर महाराष्ट्राला कर्नाटकशी जोडणारा नवीन रिंगरोड बांधण्याची घोषणा केली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि वीज आणि अक्षय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी राष्ट्रीय महामार्गांवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाची मागणी केली होती, त्याला उत्तर म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मे महिन्याच्या शेवटी ही घोषणा केली.
किती खर्च केला जाणार
हा रस्ता किनारी प्रदेशाच्या बाहेरील काठावरून जाईल आणि त्यासाठी जवळपास बारा ते पंधरा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा दावा केला जातोय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय पत्रादेवी (गोवा-महाराष्ट्र सीमेवरील गाव) ते कर्नाटकपर्यंत रिंगरोड बनवण्याचा विचार करत आहे.
हा रिंगरोड गोव्याच्या बाहेरील भागातून जाईल आणि राज्याच्या मध्यभागी जाणार नाही आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल असे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे. त्यांनी अलीकडेच गोव्यातील एका महत्त्वाच्या सभेला संबोधित केले होते आणि त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
गेल्या महिन्याच्या शेवटी दक्षिण गोव्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेत मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि याच कार्यक्रमावेळी त्यांनी या नव्या रिंग रोडची घोषणा केली आहे आणि तेव्हापासूनच हा नवा रिंग रोड प्रकल्प चर्चेत आहे.
गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांसाठी हा रिंग रोड प्रकल्प एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून या तिन्ही राज्यांच्या एकात्मिक विकासाला या नव्या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.