महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या ‘या’ 802 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 120000000000 रुपये मंजूर !

महाराष्ट्राला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. राज्य शासनाकडून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या महामार्गासाठी 120000000000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Published on -

Maharashtra Expressway : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो.

मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण करता येणे शक्य झाले आहे.

खरंतर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकार्पण झाले आहे आणि आता समृद्धी महामार्गाच्या धरतीवर प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प अबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे.

शक्तीपीठ महामार्गबाबत सरकारने काय निर्णय घेतला

मिळालेल्या माहितीनुसार शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून तब्बल 12000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Infra News India (INI) या X हँडलवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

या माहितीनुसार, नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादनासाठी महाराष्ट्र सरकारने 120000000000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

खरेतर, या प्रकल्पासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण आधीच पूर्ण झाले आहे आणि आता या महामार्ग प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामुळे लवकरच या महामार्ग प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कसा असणार शक्तीपीठ महामार्ग ?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात वर्ध्यातील पवनारपासून होणार आहे. हा मार्ग पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा तब्बल 802 किलोमिटरचा सहा पदरी महामार्ग राहणार आहे.

राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. या महामार्गाच्या रूटबाबत बोलायचं झालं तर याची सुरुवात वर्ध्यातून होते आणि पुढे हा मार्ग यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून जाणार आहे.

हा मार्ग माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी. कणेरी, पट्टणकडोली, सिद्धरामेश्वर आदमापूर, पत्रादेवी (गोवा) या सर्व तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!