Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत तसेच भविष्यात आणखी काही नवीन महामार्गाची कामे सुरू होणार आहेत. सुरत ते चेन्नईदरम्यान देखील नवा महामार्ग तयार केला जाणार असून हा महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे.
दरम्यान आता याच महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. खरंतर या महामार्ग प्रकल्पाचे काम आपल्या महाराष्ट्रात रखडले आहे. हा महामार्ग प्रकल्प 1271 किलोमीटर लांबीचा असून या प्रकल्पाचा काही भाग नाशिक जिल्ह्यातून देखील जाणार आहे, पण जिल्ह्यात पर्यावरणीय मंजुरी, व्हॅल्युएशन आणि मंजुरी प्रक्रियेविना प्रकल्पाचे काम रखडले असल्याची बातमी समोर आली आहे.

खरंतर या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीपैकी 70 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील जमीन मालक चिंतेत आले आहेत. दरम्यान आता आपण याच प्रकल्पाची सर्व आवश्यक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे प्रकल्प?
सुरत – चेन्नई महामार्गाचा 122 किलोमीटर लांबीचा भाग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. हा मार्ग जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड आणि सिन्नर या तालुक्यातुन जातो आणि या संबंधित भागातील बहुतांशी जमिनीचे संपादन देखील पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील जवळपास 70% जमिनीचे संपादन पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बारा महिन्यांपासून प्रकल्प अनेक ठिकाणी स्थगित झाला यामुळे जमीन मालक चिंतेत आले आहेत. जिल्ह्यात जवळपास 196 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे.
खरंतर 1271 किलोमीटर लांबीचा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या एकात्मिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे पण या प्रकल्पाचे काम रखडले आहे आणि प्रकल्पाची मंजुरी सुद्धा आता धोक्यात आली आहे.
खरेतर हा महामार्ग नाशिक- छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या पश्चिम घाटातुन जातोय. हा तोच परिसर आहे जो की पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. दरम्यान केंद्रीय पर्यावरण मूल्यांकन समितीकडून या मार्गावरील पर्यावरणीय परिणामांबाबत इशारा देण्यात आला आहे आणि तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
जंगलतोड, मृदारक्षण आणि जैवविविधतेवरील परिणाम लक्षात घेऊन, समितीने पूर्वीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या अपग्रेडवर भर द्यावा, अशी सूचना सुद्धा केली आहे.
म्हणजेच नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या या महामार्ग प्रकल्पाला पर्यावरण मूल्यांकन समितीकडून अजून मंजुरी मिळालेली नाही याउलट समितीकडून सध्याच्या महामार्गाचे अपग्रेडेशन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान या साऱ्या डेव्हलपमेंट पाहिल्या असता सदरील प्रकल्पाला पर्यावरणाची मंजुरी मिळणार की नाही अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर याची एकूण लांबी 1271 किलोमीटर इतकी आहे.
या महामार्गाची नाशिक जिल्ह्यातील लांबी 122 किलोमीटर इतकी आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चेन्नई ते दिल्ली दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
नाशिक ते सोलापूर यादरम्यानचा प्रवास हा महामार्ग प्रकल्प वेगवान बनवेल कारण की यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचे अंतर 135 किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच सुरत ते चेन्नई हे एकूण अंतर 320 किलोमीटरने कमी होणार आहे.