महाराष्ट्रातील शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार ? अखेरकार शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर!

सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू झाल्यात आणि यामुळे साहजिकच राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार हा मोठा सवाल होता. खरंतर राज्य बोर्डाच्या शाळा कधीपासून सुरू होणार याच्या तारखा गेल्या अनेक दिवसांपासून फिरत आहेत, पण शिक्षण विभागाकडून याबाबतचे अधिकृत आदेश अजून पर्यंत जारी करण्यात आले नव्हते मात्र आता याचे अधिकृत आदेश समोर आले आहेत.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांची घंटा कधी वाजणार ? या प्रश्नाचे उत्तर अखेरकार शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. खरे तर गेला काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधीपासून सुरू होणार हा प्रश्न उपस्थित करत आहेत.

9 जून रोजी सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्यात आणि त्यानंतर राज्य बोर्डाची शाळेची घंटा कधी वाजणार हा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

दरम्यान आता या संदर्भात शिक्षण विभागाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. राज्य बोर्डाच्या शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार ? याची शिक्षण विभागाने अधिकृत तारीख सुद्धा जाहीर केली आहे. 

राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार? 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून 2025 पासून सुरू होणार आहे. पण राज्याच्या विदर्भ विभागातील शाळा 23 जून पासून सुरु होतील.

विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे तर विदर्भातील नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 23 जून 2025 पासून होईल अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान शाळेची गुणवत्ता वाढवणे व विद्यार्थ्यांची उपस्थिती सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ज्या दिवशी होईल त्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमाची आखणी सुद्धा शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी, सुविधांचा आढावा घेणे अपेक्षित असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यासाठी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त आणि विभागीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले असून, शाळांतील भौतिक सुविधा, पोषण आहार, स्वच्छता व अध्ययन क्षमतेवर भर देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

खरंतर महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन पातळी उंचावणे हे राज्याचे लक्ष्य आहे. याच अनुषंगाने सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दत्तक शाळांचे जबाबदारी देण्यात आली आहे.

जाणकार लोकांनी या उपक्रमामुळे समाज व पालकांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी सुद्धा असाच आशावाद यावेळी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News