राज्यातील 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 16 जूनपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा, परिवहन मंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून राज्यातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Schools : उद्यापासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरू झाल्यानंतर आता राज्य बोर्डाच्या शाळा सुद्धा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून राज्य बोर्डाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागातील जवळपास 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू होतील तर विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार अशी माहिती हाती आली आहे.

खरेतर, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः परिवहन मंत्र्यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.

परिवहन विभागाचा निर्णय काय?

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता एसटी बस पास थेट शाळेतच उपलब्ध करून दिला जाणार आहे. परिवहन विभागाने नुकताच हा निर्णय घेतला आहे.

खरे तर, आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांना एसटी पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना डेपो जावे लागायचे मात्र आता नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना यासाठी एसटी डेपोत जाण्याची गरज नाही.

या नव्या शैक्षणिक वर्षात परिवहन विभागाकडून “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही नवीन मोहीम हाती घेण्यात आली आहे. या नव्या मोहिमेअंतर्गत एसटी महामंडळाचे कर्मचारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पास देतील.

महत्वाची बाब अशी की शाळांनी यासाठी विद्यार्थ्यांची यादी आधीच तयार करून एसटी प्रशासनाला द्यायची आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच अर्थातच 16 जून 2025 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. 

विद्यार्थ्यांना किती सवलत मिळते 

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की सध्या एसटीने शालेय प्रवासासाठी 66.66% सवलत दिली जाते. म्हणजे विद्यार्थी फक्त 33.33% शुल्क भरून मासिक पास मिळवू शकतात.

याशिवाय, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत पास मिळतो. म्हणजेच मुलींना 100% सवलतीसह पास मिळतो.

नक्कीच या निर्णयामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मुलींची उपस्थिती यामुळे नक्कीच वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!