Nashik News : मुंबई, पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाचे शहरे. नाशिक जिल्हा हा मुंबई आणि पुणे प्रमाणेच आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. पण तुम्हाला या जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुक्यांची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नाशिक जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, औद्योगिक आणि कृषी असे महत्त्वाचे घटक लक्षात घेऊन आज आपण जिल्ह्यातील टॉप 5 तालुके ठरवण्यात आले आहेत, या तालुक्यांना रँकिंग देण्यात आली आहे. पण ही माहिती शासकीय नाही.

हे आहेत नाशिक जिल्ह्यातील टॉप पाच श्रीमंत तालुके
1) नाशिक तालुका : हे जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक समृद्धीचे केंद्र आहे. या तालुक्याला आपण जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका म्हणू शकतो. नाशिक शहर जिल्ह्याचं प्रशासकीय आणि आर्थिक केंद्र आहे.
शहरात IT, मॅन्युफॅक्चरिंग, शिक्षण, आरोग्य, रिअल इस्टेट व वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये मोठी उलाढाल होते. या तालुक्यात अंबड आणि सातपूर सारख्या एमआयडीसी आहेत जिथे दहा हजाराहून अधिक लघु व मध्यम उद्योग कार्यरत आहेत. यामुळे या तालुक्याला आर्थिक समृद्धता लाभली आहे.
या तालुक्यात रेल्वेचे आणि रस्त्यांचे चांगले मोठे नेटवर्क आहे. येथील पायाभूत सुविधा तालुक्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावतात. या तालुक्यातून समृद्धी महामार्ग सुद्धा जातो. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तालुक्याला दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला आहे. नाशिक हे वाइन कॅपिटल म्हणूनही प्रसिद्ध आहे.
2) निफाड तालुका : निफाड हा देखील जिल्ह्यातील एक आर्थिक दृष्ट्या संपन्न तालुका आहे. कृषी आणि वाईन उद्योगामुळे या तालुक्याची भरभराट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक बागायती भाग, गोड पाणी व गाळयुक्त मातीमुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षशेती फुललेली आहे.
त्यामुळे या तालुक्यात Sula, York, Zampa यांसारख्या वाईन कंपन्यांची मुळे पसरलेली आहेत. येथून फळे व भाजीपालांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे.
या तालुक्यात कोल्ड स्टोरेज आणि मोठमोठे अन्नप्रक्रिया उद्योग विकसित झालेले आहेत. हा तालुका प्रति हेक्टरी उत्पन्नात अग्रगण्य बनलाय. शेती योजनांमुळे येथील शेतकरी समृद्ध बनलाय आणि परिणामी तालुक्यातील समृद्धता आणखी वाढली आहे.
3) इगतपुरी तालुका : हा देखील जिल्ह्यातील एक प्रगत तालुका आहे. या तालुक्याची औद्योगिक प्रगती खरच उल्लेखनीय आहे. इगतपुरी येथील “Rail Wheel Factory” ही आशियातील एक नामांकित रेल्वे उत्पादन केंद्र याच तालुक्यात वसलेले आहे. लार्सन अँड टुब्रो, Mahindra & Mahindra यांसारख्या कंपन्यांचे संयंत्र सुद्धा येथे आहे.
घाटनदेवी, विपश्यना केंद्र, कासारा घाट, भाटसा धरण अशा विविध पर्यटनस्थळांमुळे येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. पर्यटनामुळे येथे दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. मुंबई – नाशिक एक्सप्रेस वे आणि रेल्वे प्रकल्पांमुळे येथील पायाभूत सुविधा गेम चेंजर ठरत आहेत.
4) त्र्यंबकेश्वर तालुका : ऐतिहासिक सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या या तालुक्याला विशेष महत्त्व आहे आणि आर्थिक दृष्ट्या हा तालुका फारच संपन्न बनलाय. धार्मिक व नैसर्गिक पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून या तालुक्याला ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग मंदिर याच तालुक्यात वसलय आणि दरवर्षी इथे लाखो भाविकांचे आगमन होते.
गोदावरी नदीचे उगम स्थान याच तालुक्यात आहे. जैविक शेती व आदिवासी भागात शेतीमाल उत्पादनासाठी MSME कंपन्यांची गुंतवणूक वाढलेली आहे. सिन्नर व नाशिक शहराच्या निकटतेमुळे येथे सर्व प्रकारचा वाणिज्य विकास झालाय.
5) सिन्नर तालुका : हा तालुका नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख औद्योगिक झोन बनलाय. महाराष्ट्रातील मोठ्या उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून या तालुक्याची ओळख आहे. Sinnar MIDC मध्ये 400+ युनिट्स आहेत. इथे अनेक मल्टिनॅशनल कंपनी, ऑटो पार्ट्स, फार्मा कंपन्यांचा मोठा जमाव आहे. नाशिक-पुणे हायवे, समृद्धी महामार्ग, जवळचं रेल्वे जंक्शन यामुळे वाहतुकीत सुलभता आहे.
तालुक्यात विविध शैक्षणिक संस्था आणि आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. नवीन शिक्षण संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजेस व आरोग्य केंद्रांची वाढती उपस्थिती यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास झालाय. हेच कारण आहे की हा देखील तालुका जिल्ह्यातील एक आर्थिक दृष्ट्या संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो.