पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी !

पुणे - नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरंतर हा प्रकल्प काही तांत्रिक कारणांमुळे रखडला आहे पण आता लवकरच या प्रकल्पाला गती मिळू शकते.

Published on -

Pune – Nashik Railway : पुणे, नाशिक आणि मुंबई ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाची शहरे. मात्र आजही पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही.

यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने या दोन्ही शहरादरम्यान थेट रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी या परिसरातील नागरिकांची इच्छा आहे आणि याच मागणीच्या अनुषंगाने पुणे – नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

मात्र हा प्रकल्प काही कारणांमुळे रखडला असून आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. 

काय आहे नवीन अपडेट

जसं की आपण ठाऊकच आहे की, पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्प जुन्नरमधील खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्पामुळे अडकलेला आहे.

मात्र, या प्रकल्पाच्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुद्धा उपस्थित होते.

ही बैठक मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि सोलापूर विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय खासदारांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

दरम्यान या बैठकीत पुणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आदी पक्षांच्या खासदारांनी एकमुखी पाठिंबा दर्शवत हा प्रकल्प जुन्याच मार्गावरून राबवावा, अशी मागणी केली आहे.

खासदारांनी जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे रेडिओ दुर्बिण प्रकल्प असूनही तेथे रेल्वे आणि विज्ञान प्रकल्पांचे सहअस्तित्व शक्य झाले, हे निदर्शक उदाहरण सुद्धा मांडले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, नीलेश लंके, विशाल पाटील आदी उपस्थित होते. रेल्वे समितीच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली. 

….तर जुन्या मार्गानेच रेल्वे मार्ग शक्य 

या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांचा रेल्वे प्रकल्पाला विरोध नाही, तर त्यांना फक्त सुरक्षिततेबाबत उपाययोजना हवी आहे.

यामुळे या ठिकाणी उंच पूल किंवा बोगद्याद्वारे मार्गिका काढली जाऊ शकते. नाशिक, सिन्नर व शिर्डी भागातील शेतकऱ्यांचे भूसंपादन पूर्ण झाले असून, हा प्रकल्प औद्योगिक आणि शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 

नक्कीच डॉक्टर कोल्हे यांनी सांगितल्याप्रमाणे जर GMRT च्या ठिकाणी पुलाची किंवा बोगद्याची निर्मिती करण्यात आली तर हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर तसेच पुण्यातील नागरिकांसाठी अधिक फायद्याचा ठरणार आहे.

दरम्यान याप्रसंगी उपस्थित खासदारांनी पूर्वीच्या डीपीआरप्रमाणेच मार्ग निश्चित करण्याची मागणी करत, प्रकल्पाच्या गतीसाठी रेल्वेला स्पष्ट दिशा देण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळे या संदर्भात आता पुढे काय निर्णय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!