Pune News : पुण्याहून कोकणात आणि कोकणातुन पुण्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातून कोकणात जाणारा एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर, जून महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच पावसाने उसंत दिली होती. मान्सून आगमन झाल्यानंतरही महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस होत नव्हता आणि यामुळे शेतकरी बांधव चिंतेत होते.

मात्र आता राज्यातील पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होत आहे. कोकणात देखील पावसाचा जोर वाढला आहे विशेषतः कोकणाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे.
हेच कारण आहे की पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा घाट मार्ग आता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा घाट मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद
गेल्या काही दिवसांपासून पुणे विशेषता जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि कोकणात प्रचंड पाऊस सुरू आहे आणि आगामी काही दिवस पावसाचेच राहणार आहेत. भारतीय हवामान खात्याकडून पुढील काही दिवस यासंबंधीत भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा वरंधा घाट आता सुरक्षिततेच्या कारणांवरून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरंधघाट मार्गावरील वाहतूक आता पुढील काही महिने बंद राहणार आहे.
https://x.com/InfoRaigad/status/1935965993408381317?t=nPwOn1Ta_T2hvUFlnC1jRA&s=19
किती महिने बंद राहणार घाट ?
वरंध घाट मार्ग 20 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून देण्यात आली आहे.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने प्रवाशांच्या सुरक्षितता लक्षात ठेवून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
खरेतर, वरंध घाटात दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात होण्याची शक्यता असते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील काही दिवस या भागात अतिवृष्टी सारखा पाऊस पडेल असा अंदाज दिलेला आहे.
आता जोरदार पावसामुळे या मार्गावर काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. याआधीही वरंध घाट मार्गात अशा प्रकारच्या अपघातांची नोंद आहे. या अपघातांमुळे वित्त आणि जीवित हानी झालेली आहे.
हेच कारण आहे की आता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आजपासून म्हणजेच 20 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत हा घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
पर्यायी मार्ग कोणता आहे ?
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार हा घाट रस्ता बंद असल्याने कोकणातून पुण्याला जाण्यासाठी राजेवाडी फाटा-महाड-माणगाव-ताह्मिणी घाट-पुणे या मार्गाचा वापर करायला हवा. तसेच कोल्हापूरला जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळून-कराड-कोल्हापूर या मार्गाने प्रवास करता येणे शक्य आहे.