Pune News : महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये पुणे हा एक असा जिल्हा आहे जो आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक प्रगत जिल्ह्यांमध्ये येतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक श्रीमंत जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुणे शहर देखील राज्यातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत येते.
पुण्याला विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या मोठी आहे आणि यामुळे पुण्याला स्पर्धा परीक्षेचे केंद्र सुद्धा म्हटले जाते.

पुण्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा देखील फारच गौरवास्पद आहे आणि पुणे हे नेहमीच औद्योगिक केंद्र राहिले आहे. यामुळे ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण इथल्या विकासाला योग्य ठरते असं नेहमीच बोललं जातं.
पुण्याबाबत बोलायचं झालं तर शिक्षण, उद्योग, शेती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हा जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र पुण्याच्या विकासात पुणे जिल्ह्यातील तालुक्यांचा आणि तेथील गावांचा मोठा वाटा आहे ही बाब आपल्याला नाकारून चालणार नाही.
खरे तर पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत मात्र यापैकी पाच तालुके फारच संपन्न आहेत आणि आज आपण जिल्ह्यातील टॉप पाच श्रीमंत तालुक्यांची माहिती पाहणार आहोत.
पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जिल्ह्यातील हवेली तालुका हा सर्वाधिक श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जातो. कारण म्हणजे या तालुक्यात पुणे शहराचा बहुतांशी भाग येतो आणि यामुळेच हा तालुका सर्वाधिक श्रीमंत तालुका आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांच्या यादीत हवेली तालुक्याचा पहिला नंबर लागतो.
हे आहेत पुण्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांच्या यादीत हवेली तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो आणि दुसऱ्या क्रमांकावर मुळशी तालुक्याचा समावेश होतो. मुळशी तालुक्यात हिंजवडी IT पार्क आणि अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आहेत.
यामुळे हा तालुक्या आर्थिकदृष्ट्या संपन्न बनलेला आहे. तसेच शिरूर तालुका हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो. येथे रांजणगाव MIDC औद्योगिक क्षेत्र आहे.
खेड तालुका हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांची यादी चौथ्या क्रमांकावर येतो, या तालुक्यात ऑटोमोबाईल उद्योग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि यामुळे या तालुक्याची भरभराट झालेली आहे.
राज्यातील सर्वाधिक चर्चेतला तालुका, उपमुख्यमंत्री अजित पवार ज्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात तो बारामती तालुका या यादीत पाचव्या क्रमांकावर येतो. हा तालुका कृषी आणि साखर कारखान्यांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात प्रगत झालेला आहे.