Pune Railway News : पुणेकरांसाठी एक अगदीच महत्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांसाठी एका नव्या रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल अशी आशा आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी एका नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली आहे. पुणे रेल्वे जंक्शनवरील वाढता ताण लक्षात घेऊन या नव्या रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार पुण्यातील नवा रेल्वे मार्ग?
भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. देशातील बहुतांशी भाग रेल्वेने कनेक्ट करण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी अजून पर्यंत रेल्वे पोहोचलेली नाही तिथे रेल्वेचे नेटवर्क निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून आणि शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
शिवाय ज्या ठिकाणी रेल्वेचे नेटवर्क पोहोचलेले आहे ते नेटवर्क आणखी मजबूत बनवण्यासाठी रेल्वे कडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान पुण्यातील रेल्वे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे कारण की पुणे जंक्शन वरील वाढतात आणि लक्षात घेता आता पुण्याचा रिंगरोड एका नव्या समर्पित रेल्वेमार्गाशी जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे.
स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. या नव्या रेल्वे मार्गाचे रूट बाबत बोलायचं झालं तर हा लोहमार्ग तळेगाव दाभाडे ते चाकण, रांजणगाव मार्गे उरुळी कांचनपर्यंत जाणार असून, यामुळे पुणे रेल्वेस्थानकावरील भार कमी होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अजित पवार भोसरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलत होते, यावेळी त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी असे सांगितले की, पुण्यातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.
ती सोडवण्यासाठी रिंगरोड अत्यावश्यक आहे. यासाठी सुमारे 25 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून नव्या निविदा काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा नवीन रेल्वेमार्ग केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे, तर चाकण आणि रांजणगाव येथील औद्योगिक विकासालाही चालना देणारा ठरणार आहे.
सध्या पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक गाड्या धावत असल्याने फलाट उपलब्ध नसल्यामुळे 72 गाड्यांना सिग्नलवर थांबावे लागते.
ही समस्या दूर करण्यासाठी हा समर्पित मार्ग तयार केला जाणार आहे. रेल्वेशी समन्वय साधून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल, अशी सुद्धा माहिती उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिली आहे.