रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आणखी 2 नवीन रेल्वे मार्ग तयार होणार, 6405 कोटी रुपयांच्या ‘या’ प्रकल्पांना सरकारची मंजुरी

देशातील रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून देशातील दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील नवीन माहिती पाहणार आहोत.

Published on -

Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतलाय. मोदी सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी ते शनिशिंगणापूर या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली असून या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे राहुरी ते शनिशिंगणापूर यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे आणि शिर्डी तसेच शनिशिंगणापूर येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची यामुळे मोठी सोय होणार आहे.

भाविकांसाठी भविष्यात शिर्डी आणि शनिशिंगणापूरला जाणे अधिक सोयीचे होणार आहे. दरम्यान आता केंद्रातील सरकारकडून पुन्हा दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने बुधवारी दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याची बातमी हाती आली आहे. 

या दोन रेल्वे प्रकल्पांना सरकारची मंजुरी 

झारखंडमधील कोडरमा-बरकाकाना या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पास आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील बल्लारी-चिकजाजूर दुहेरीकरण प्रकल्पासह केंद्रातील सरकारकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे, अर्थात या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय सरकारची मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, हे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल. 

किती खर्च केला जाणार? 

या दोन्ही रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वेचे जाळे तब्बल 318 किलोमीटरने वाढणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पासाठी जवळपास 6405 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हे दोन्ही मार्ग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी महत्त्वाचे आहेत आणि कार्बन उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी करतील आणि त्याचबरोबर कार्यक्षमतेत वाढ करतील. म्हणजेच यामुळे रेल्वे प्रवास तर सोयीचा होणारच आहे शिवाय पर्यावरणाचे संवर्धन सुद्धा शक्य आहे.

हे दोन्ही प्रकल्प कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहेत असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. यातील कोडरमा-बरकाकाना (अरिगाडा) दुहेरीकरण प्रकल्प हा एक 133 किलोमीटर लांबीचा आहे आणि यासाठी 3 हजार 63 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल.

ही लाईन पाटणा आणि रांची दरम्यान सर्वात लहान रेल्वे कनेक्शन बनवते आणि शहरांतर्गत प्रवास आणि लॉजिस्टिक्ससाठी महत्त्वाची आहे. दुसऱ्या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर बल्लारी-चिकजाजूर दुहेरीकरण प्रकल्प अंतर्गत 185 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होणार आहे यासाठी अंदाजे 3,342 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

ही रेल्वे लाईन मंगलोर बंदराला सिकंदराबादशी जोडते आणि लोहखनिज, कोकिंग कोळसा, पोलाद, खते, पेट्रोलियम उत्पादने आणि अन्नधान्य यासारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी ही लाईन फारच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या लाईनमुळे या भागातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News