Pune Top 5 Picnic Spot : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात चांगला पाऊस झालाय. विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा अलीकडे पावसाचा जोर वाढलाय. यामुळे अनेकजण आता पिकनिकचा प्लॅन बनवत आहे. खरे तर पावसाळी पिकनिक साठी महाराष्ट्रात शेकडो पर्यटन स्थळे आहेत. पण आज आपण पुण्यातील पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, या शहराला विद्येचे माहेरघर आणि स्पर्धा परीक्षांचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्ष म्हणजे पुणे जिल्हा. छत्रपती शिवप्रभुरायांचा बराचसा काळ याच जिल्ह्यात गेला आणि यामुळे या जिल्ह्याला लाभलेला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा हा फारच मोठा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा जिल्हा पर्यटनासाठी सुद्धा तेवढाच प्रसिद्ध आहे. यामुळे जर तुम्ही पुण्याला भेट देणार असाल तर कोणत्या ठिकाणी आवर्जून जायला हवे याचीच आज आपण माहिती पाहणार आहोत.

महाबळेश्वर : पावसाळी पिकनिकचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी पुणे जिल्ह्यातील महाबळेश्वर हे ठिकाण परफेक्ट ठरणार आहे. पश्चिम घाटात वसलेलं हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी नेहमीच आवडीचे राहते. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात आणि तुम्ही सुद्धा येथे जाऊ शकता. मित्रांसमवेत किंवा तुमच्या परिवारासमवेत तुम्ही येथे पिकनिकचा प्लॅन करू शकता येथे असणारे पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे, हिरव्या शालूने नटलेले डोंगर – दऱ्या, स्ट्रॉबेरी फॉर्म्स आणि थंड हवामान तुम्हाला नक्कीच भुरळ घालणार आहे. या ठिकाणाची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे ठिकाण पुण्यापासून फक्त 120 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पावसाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही मोठी गर्दी होते.
भीमाशंकर : भीमाशंकर हे ठिकाण महाबळेश्वर पेक्षा जवळ आहे.महाबळेश्वर हे पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे तर भीमाशंकर हे फक्त शंभर किलोमीटर अंतरावर वसलेलं एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. या ठिकाणाची सर्वात मोठी खासियत म्हणजे धार्मिकदृष्ट्या याला विशेष महत्त्व आहे. कारण असे की या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व यामुळे या ठिकाणाची लोकप्रियता अधिक वाढते आणि अनेकजण या ठिकाणी पिकनिकचा प्लॅन बनवतात. तुम्ही सुद्धा तुमच्या परिवारासमवेत इथे पिकनिक साठी येऊ शकता.
सिंहगड किल्ला : छत्रपती शिवरायांचे शूर मावळे तानाजी मालुसरे यांची आठवण करून देणारा किल्ला. गड आला पण सिंह गेला असे उद्गार ज्या शूर मावळ्यासाठी छत्रपती शिवप्रभूंनी काढलेत ते तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणजेच सिंहगड किल्ला. हा सिंहगड किल्ला इतिहासप्रेमी व ट्रेकर्ससाठी आवडतं ठिकाण आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे ठिकाण पुण्यापासून फारच जवळ आहे. पुण्यापासून अवघ्या 35 किमीवर असलेला हा किल्ला नेहमीच पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरते. हा किल्ला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या शालूने सजतो.
लोणावळा-खंडाळा : हे देखील पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. लोणावळा खंडाळा हे पुणे जिल्ह्यातील एक जुळे हिल स्टेशन सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. पावसाळ्यात इथे धबधबे, हिरवाई, गुहा आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहायला मिळतात. या ठिकाणी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेमुळे सहज पोहोचता येतं. म्हणून जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर इथे वन डे पिकनिकचा सुद्धा प्लॅन बनवता येऊ शकतो.
लवासा : हे देखील पुण्यातील एक लोकप्रिय ठिकाण आहे. भारतातील पहिले नियोजित टेकडी शहर म्हणून याची ओळख आहे. लवासा हे शहर इटालियन शहर पोर्टोफिनोपासून प्रेरित आहे. येथे वॉटर स्पोर्ट्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि आरामदायी रिसॉर्ट्ससह नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येतं. त्यामुळे जर तुम्हाला पावसाळ्यात कुठे पिकनिक साठी जायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.