महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार आणखी दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस !

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी दोन नव्या वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. रेल्वे बोर्डाकडून लवकरच या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.

Published on -

Vande Bharat Express : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे आणि सध्या ही गाडी देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. महत्त्वाची बाब अशी की या गाड्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढवले जात आहे.

महाराष्ट्राबाबत विचार करायचे झाल्यास राज्यात सध्या 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. यातील तीन गाड्या उपराजधानी नागपूरला मिळाल्या आहेत. महत्वाची बाब अशी की, विदर्भवासियांना आणखी दोन नव्या गाडीची भेट मिळणार आहेत. आणखी दोन नव्या वंदे भारत ट्रेन विदर्भवासियांच्या सेवेत दाखल होणार आहेत आणि या दोन्ही गाड्या उपराजधानी नागपूर येथूनच धावतील असे वृत्त नुकतेच हाती आले आहे.

जानेवारी महिन्यात नागपूरला दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे सांगितले गेले होते. रेल्वे प्रशासनाने नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या दोन मार्गांवर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू केल्या जातील अशी माहिती जानेवारी महिन्यात दिली होती.

नागपूर विभागाने सादर केला प्रस्ताव !

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला होता. मात्र, या संदर्भात अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही म्हणजेच रेल्वे बोर्डाने अद्याप या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. सध्या उपराजधानी नागपूर येथून तीन गाड्या सुरू आहेत. नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते सिकंदराबाद या तीन मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.

पण आगामी काळात जर नागपूर ते पुणे तसेच नागपूर ते मुंबई या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर नागपूर शहरातील वंदे भारतची संख्या 5 पर्यंत जाणार आहे. नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे मात्र गाड्यांची संख्या मर्यादित आहे.

यामुळे गरजवंत नागरिकांना बसेस सारख्या इतर वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागतो. म्हणूनच या दोन्ही मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांना फायदा होणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर नागपूर ते मुंबई आणि पुण्याचा प्रवास वेगवान होणार आहे. तथापि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून कधीपर्यंत निर्णय घेतला जाणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!