ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या राशी आणि त्या राशींवर ग्रहताऱ्यांच्या अनुषंगाने पडणारा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव या गोष्टींचा सखोलपणे अभ्यास केलेला असतो. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलेल्या अनेक महत्त्वाच्या बाबी आजही भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर केल्या जातात किंवा पाळल्या जातात.
उदाहरणच घ्यायचे झाले तर एखादी शुभ गोष्टीची सुरुवात करायची असेल तरी देखील आपण त्याचा मुहूर्त बघूनच सुरुवात करतो.इथपर्यंत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्योतिष शास्त्राचे महत्त्व आहे.

अगदी या अनुषंगाने बघितले तर भारतीय परंपरेमध्ये तुळस तसेच पिंपळ वडासारख्या झाडांना देखील अतिशय महत्त्व आहे व हे महत्त्व ज्योतिष शास्त्राने देखील विशद केले असून कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते झाड लावणे गरजेचे आहे याबाबत देखील ज्योतिष शास्त्रामध्ये माहिती दिलेली आहे. हीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणते झाड लावावे?
1- मेष राशी– जर ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असून यानुसार मेष राशींच्या व्यक्तींनी जर डाळिंब, लिंबू तसेच तुळस, आवळा आणि आंबा या झाडांशिवाय मंगळवारी लाल चंदन आणि खैराचे रोपे लावणे गरजेचे आहे. कारण ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर या वृक्षांमुळे मेष राशींच्या व्यक्तींना नवा आत्मविश्वास मिळतो व आयुष्यात अनेक शुभ परिणाम दिसायला लागतात.
2-वृषभ राशी– या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असून या लोकांनी जर कुठलीही पांढरी फुले येणारी रोपे लावली तर त्याचा फायदा होतो. या राशींच्या व्यक्तींनी पांढरी फुले येणाऱ्या रोपांची लागवड करून त्यांची योग्य वाढ होईपर्यंत त्यांची काळजी घेणे गरजेचे राहील. त्यामुळे वृषभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ शकते. यामध्ये चमेली तसेच जांभूळ व अशोक इत्यादी झाडे या राशींचे व्यक्ती लावू शकतात.
3- मिथुन– या राशीचा स्वामीग्रह बुध आहे व बुधवारच्या दिवशी जर मिथुन राशींच्या व्यक्तीने पेरू तसेच मनी प्लांट, तुळस, आंबा यासारखी हिरवी पाने असलेली झाडे आणि रोपे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आर्थिक सुख समृद्धी आणि समाधान लाभेल.
4- कर्क राशी– या राशीचा स्वामी ग्रह चंद्र असून कर्क राशींच्या व्यक्तींनी सोमवारी रातराणी, चमेली, मोगरा, आवळा आणि पिंपळ यांची रोपे लावणे गरजेचे आहे. याशिवाय गवती चहा, तुळस आणि पुदिना सारख्या वनस्पती देखील लावू शकतात. असं केल्यामुळे कर्क राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे नव्हे मार्ग खुले होण्यास मदत होईल.
5- सिंह राशी– या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे व या लोकांनी सूर्यफूल, लाल गुलाब तसेच लाल झेंडू यासारखे फुलझाडे लावणे गरजेचे आहे व याशिवाय वड किंवा लाल चंदन व जांभळाची झाडे देखील लावू शकता.
(टीप– वरील माहिती ही वाचकांसाठी केवळ माहितीस्तव सादर केलेली आहे. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा या माहितीचे समर्थन करत नाहीत.)