मोठी बातमी ! मुंबई – कोल्हापूर वंदे भारत ट्रेन ‘या’ तारखेपासून रुळावर धावणार, महाराष्ट्रातील 6 रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार

मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. दरम्यान आता आपण ही गाडी सुरू झाल्यानंतर कोण - कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आणि ही गाडी कधीपासून रुळावर धावणार याबाबतची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. खरंतर राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे कारण की राज्याला आता एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून ही गाडी कधीपर्यंत रुळावर धावणारी या संदर्भात नवीन अपडेट हाती आली आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद,

पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावते. दरम्यान आता लवकरच मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.

कधी सुरू होणार मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस

ही गाडी नेमक्या कोणत्या तारखेला रुळावर धावणार याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण येत्या पंधरा दिवसात ही गाडी रुळावर धावताना दिसणार आहे.

मुंबई – कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केली जात होती आणि अखेरकार आता ही मागणी येत्या पंधरा दिवसांनी पूर्ण होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जारी केले जाणार आहे. तसेच या गाडीचे तिकीट दर कसे असणार याबाबतही लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

यामुळे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. खरे तर श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक कोल्हापुरात गर्दी करत असतात आणि यामुळे श्रीक्षेत्र कोल्हापूरसाठी मुंबईवरून वंदे भारत ट्रेन सुरू होणे आवश्यक होते आणि यानुसार आता ही नवीन गाडी सुरू होणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार वंदे भारत

मुंबई – कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी या मार्गावरील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या मार्गावरील सहा महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला थांबा मंजूर करण्यात आला असल्याचा दावा केला जातोय.

सध्या स्थितीला मुंबई ते कोल्हापूर या मार्गावरील रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 10 तासांचा वेळ लागतोय मात्र जेव्हा वंदे भारत ट्रेन सुरू होईल तेव्हा हा प्रवासाचा वेळ तीन तासांनी कमी होईल म्हणजेच सात तासात हा प्रवास पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News