Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व दाखवण्यात आले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात असे म्हटले गेले आहे ते नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करत असतात. नवग्रह 12 राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये प्रवेश करतात.
दरम्यान जेव्हा केव्हा ग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान, येत्या काही दिवसांनी ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे.

खरे तर बुध ग्रह प्रत्येक तीस दिवसांनी राशी परिवर्तन करतो. यानुसार 22 जूनला बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे आणि आता बुध ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याचाच प्रभाव म्हणून राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा शुभकाळ सुरू होणार आहे.
या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार
कर्क : या राशीसाठी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन विशेष लाभाचे ठरणार आहे. 22 जून नंतर या राशीच्या लोकांचा वाईट काळ समाप्त होईल आणि सुवर्णकाळाला सुरुवात होणार आहे.
बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात मोठे सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. या लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल असे बोलले जात आहे. या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळू शकते सोबतच कौटुंबिक मतभेद सुद्धा दूर होणार आहेत.
कन्या : या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ लाभाचा राहणार असे बोलले जात आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ लाभदायक राहील असे ज्योतिष तज्ञांचे म्हणणे आहे. कन्या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता संपणार आहे आणि 22 जून पासून खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात माझ्या सुवर्ण काळाची सुरुवात होईल.
बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनानंतर या राशीच्या लोकांच्या इन्कम मध्ये मोठी वाढ होणार आहे. या लोकांना शेअर मार्केट आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. चतुराईने गुंतवणूक करणे या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
तूळ : या राशीच्या जातकांसाठी देखील बुध ग्रहाचे राशी परिवर्तन लाभाचे ठरणार आहे. बुध ग्रहाचा प्रभाव म्हणून या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. बुध ग्रहाच्या कृपेने या राशीच्या लोकांना करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये चांगली प्रगती करता येणार आहे.
या काळात या लोकांना नवीन नोकरीची भेट मिळू शकते. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळेल. जे लोक सध्या नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन सारखी किंवा पगारवाढीसारखी भेट मिळू शकते.
व्यवसायिकांना सुद्धा हा काळ चांगला लाभाचा राहणार आहे. कारण, व्यवसाय विस्ताराच्या संधी निर्माण होतील. मीडिया, बँकिंग आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अधिक फायद्याचा राहणार असे ज्योतिष तज्ञांचे म्हणणं आहे.