शिर्डी शहर व मंदिर परिसरात थुंकूम घाण करू नका नगरसेविकेने केले जनतेस आवाहन !

शिर्डी : साईभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पिंपळवाडी रोडलगतच्या फुटपाथ कडेला गुटखा खाऊन थुंकलेले चित्र शहर व भाविकांना दृष्टीने अतिशय चुकीची बाब आहे. शहरात तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांवर अशा प्रकारे थुंकून शहराच्या स्वच्छतेस बाधा आणू नये, असे आवाहन शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांनी केले. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्षा कोते यांनी म्हटले आहे की, … Read more

कौतुकास्पद : बिबट्याच्या तावडीतून तरुणाने केली वासराची सुटका

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागावरील तळेवाडी येथे नितीन तुकाराम फटांगरे या तरुणाने बिबट्याच्या तावडीतून आपल्या वासराची सुटका केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १२) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांनी ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोखरी बाळेश्वर गावाअंतर्गत असलेल्या तळेवाडी येथील तुकाराम … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेती – बाजारभाव 

नगर: बाजार समितीत शुक्रवार (दि. १३ रोजी) मेथीच्या भाजीची मोठी आवक झाल्याने भाव चांगलेच पडले होते. प्रतिजुडीला २ ते ४ चार रुपये भाव मिळाला. त्याच बरोबर कोथिंबिरीची मोठी आवक झाल्याने प्रतिजुडीला २ ते ४ रुपये भाव मिळाला. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने नोव्हेंबर महिन्यात मेथी व कोथिंबीरने चांगलाचा भाव खाल्ला होता. मेथी प्रतिजुडीला २० ते ३० … Read more

अहमदनगर शहरात साथीच्या आजारांचे थैमान !

अहमदनगर : कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करून नागरिकांना एक प्रकारे संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली. यावेळी स्वप्नील शिंदे, संजय कांबळे, सुशांत देवढे, रमाकांत सोनवणे, संजय तडके, बबलू गायकवाड, चिकू गायकवाड, रवींद्र … Read more

नामदार बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल हे नक्की वाचाच… 

भारत देशामध्ये महाराष्ट्र हे सर्वात विकसीत व आघाडीवर असलेले राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज फुले-शाहू-आंबेडकर याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा सांगणारा हा प्रांत आहे. या सर्व राष्ट्रपुरुषांच्या तत्त्वांची अंमलबजावणी करत सध्याच्या राजकारणामध्ये कार्यरत असलेले नामदार बाळासाहेब थोरात हे या सर्व वीर पुरुषांचे अनुयायी ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची … Read more

क्षुल्लक कारणावरुन महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

 अहमदनगर : नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी येथील यशवंत कॉलनीत क्षुल्लक कारणावरुन तीन महिलांनी एका महिलेस शिवीगाळ, दमदाटी करुन लोखंडी साखळी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घडली. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ममता दीपक पातारे (रा.यशवंत कॉलनी, दरेवाडी) या दुधाची पिशवी आणायला जात असताना जया देविदास पातारे व तिच्या दोन मुली महिमा व श्रद्धा (सर्व रा.यशवंत कॉलनी, दरेवाडी) … Read more

घराजवळ काम करत असलेल्या एका महिलेचा या चुकीमुळे झाला मृत्यू

कर्जत : तालुक्यातील शिंदा येथे वीज वितरणची उच्च दाबाची वाहिनी तुटल्याने आपल्या घराजवळ काम करत असलेल्या एका महिलेस आपला जीव गमवावा लागला. शिंदा ते भोसे जाणारी उच्च दाबाची वीजवाहिनी शुक्रवारी सकाळी १० वाजता अचानक तुटून खाली पडल्याने सुरेखा अनिल ननवरे वय ४२ ही गंभीर भाजून जागीच मृत्यू पडली. याशिवाय तिच्या जवळील कुत्रेही मरण पावले. १५ … Read more

…तर अहमदनगर जिल्हापरिषदेत भाजपचा अध्यक्ष होणार !

 अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या रणधुमाळीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उडी घेतली आहे. जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होऊ शकतो. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून, यात अश्­यक्­य काही नाही, असा दावा कर्डिले यांनी केला. काल शुक्रवार रोजी डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी कारखान्याच्या संदर्भात … Read more

धक्कादायक : दुपारच्या सुट्टीत वर्गात शिरून विद्यार्थिनीचा विनयभंग !

नेवासा : तालुक्यातील शिरसगाव येथे एकाने शाळेत दुपारच्या सुट्टीत वर्गात शिरून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना दि. ६ डिसेंबर राजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यावर मुलीचे वडील समजाऊन सांगण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाणही करण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तुषार राजेंद्र पोटे याने या विद्यार्थिनीच्या वर्गात जाऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, … Read more

पूरग्रस्तांच्या नावे साडे चार लाखांची फसवणूक

अहमदनगर- सावेडी परिसरातील गुलमोहोर रोडवर नवलेनगर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुम्हाला पैसे पाठवतो, असे सांगून अज्ञात इसमाने साडे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसाहेब विष्णू डमाळे (वय ४१, रा.गजानन कॉलनी, नवलेनगर, सावेडी) यांना अज्ञात इसमाने ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान कँरोल डायन … Read more

अपघातात मोटारसायकलस्वार ठार

 संगमनेर : शहरातील तीन बत्ती चौकात एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. भावडू रमेश ढेपणे (वय २२, हरसूल, जि. नाशिक) असे मोटरसायकलस्वराचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील भावडू ढेपने हा संगमनेरात एका मंडपवाल्याकडे काम करत … Read more

शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन अहमदनगर जिल्ह्यातील या संस्थेने केली तब्बल 15 लाखांची फसवणूक !

अहमदनगर : शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाणने दोघांची १५ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे घडली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद गुरुवारी (दि.१२) करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार … Read more

आ. प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या ह्या कामाचा तुम्हालाही अभिमान वाटेल !

राहुरी :  राहुरी शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतमजुर, मजूर, ग्रामीण भागातील नागरिकांचा डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सेवाभावी संस्थेच्या वतीने आ.प्राजक्त तनपुरे यांनी एक लाख रुपयांचा विमा काढला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन आ.प्राजक्त तनपुरे यांनी सदर कार्यक्रम राहुरी नगरपालिका सभागृहात आयोजीत के ला होता. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी

संगमनेर :- कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निळवंडे (ता. संगमनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, काँग्रेस सेवादलाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष कचरू पवार यांनी केली आहे. मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विधानसभेचे सभापती नाना पटोले यांची भेट घेत सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे … Read more

‘तनपुरे’ कारखान्याचे भवितव्य पुन्हा अंधारात!

अहमदनगर : उत्कृष्ट कामगिरीची ओळख असलेल्या साखर कारखान्यांमध्ये डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर करखाना अग्रेसर होता. कारखान्याच्या स्थापना काळापासूनच जिल्हा बँकेने कारखान्यास पतपुरवठा केला. कार्यक्षेत्रात अंदाजे वीस लाख टन उसाचे उत्पादन असूनही कारखाना मात्र बंद आहे. मधल्या काळात शेतकरी, कामगारांची कामधेनू पुनर्जीवित होण्यासाठी बँकेने सहकार्य केले. मात्र, कारखाना बंद असल्याने थकबाकीत वाढ होत आहे. … Read more

अहमदनगर जिल्हापरिषदेत ह्या निर्णयामुळे सदस्य झाले आक्रमक

अहमदनगर : शासनाने ग्रामपंचायत विभागाचा चौदाव्या वित्त आयोगातून परस्पर जो निधी कपात केला आहे. त्यात नगर जिल्ह्याचे एकूण ७४ कोटी रूपयांचा निधी कपात केलेला आहे. या निधी कपातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध दर्शवला. हा कपात केलेला निधी कोठे गेला. याबाबत जोपर्यंत शासन योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही पाणीयोजनेचे वीज कनेक्शन तोडू नयेत, अशी … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांची विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. माजीमंत्री शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी … Read more

काय करणार आमदार शिवाजी कर्डिले पराभूत झाल्यानंतर ? वाचा

पाथर्डी :- मी पैलवान गडी आहे. कुस्तीतल्या मैदानाप्रमाणे राजकीय आखाड्यामध्ये अनेक जय पराजय पाहिलेत. अनेकवेळा माझ्यावर मोठे आघात झाले. अनेक संकटे माझ्यावर राजकीय सुडबुध्दीने लाधली गेली. मात्र नितीमत्तेच्या बळावर मी सर्व आडचणींवर मात करू शकलो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या पराभवाने खचुन न जाता अध्र्या रात्री मला हाक द्या, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आजपासून आपण मतदार … Read more