अहमदनगर ब्रेकिंग : नववीतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक !

पारनेर :- विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या अविनाश वामन मधे (२० वर्षे, म्हसोबा झाप) याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. मधे हा दुचाक्या चोरीतील आरोपी असल्याची माहितीही पुढे आली. २२ नोव्हेंबरला ही मुलगी मैत्रीणीबरोबर पवळदरा येथून शाळेत निघाली असता घाटात अविनाश दुचाकीवरून आला. … Read more

नगर-दौंड महामार्गावर अपघातात एक जागीच ठार

श्रीगोंदे :- तालुक्यातील नगर-दौंड महामार्गावर विसापूर फाट्याजवळ टाटा सफारी वाहनाचा वेग चालकाला आवरता न आल्याने वाहन उलटून चालक जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले. महानुभाव पंथाच्या लोकांना धार्मिक कार्यासाठी नगरहून फलटणकडे घेऊन जाणाऱ्या टाटा सफारी (एमएच १६. एजे ५०६७) वाहनाचा रविवारी सकाळी ७ च्या सुमारास विसापूरफाट्या जवळ अपघात होऊन वाहनचालक चंदन किसन शिंदे … Read more

प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी !

रांची :- राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. झारखंडचे काँग्रेसचे प्रभारी आर. पी. एन. सिंह यांनी रविवारी येथे जाहीरनामा जारी करताना सांगितले की, जर राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, झामुमो आणि राजद आघाडीचे सरकार स्थापन झाले … Read more

सुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात, तर शरद पवार होवू शकतात राष्ट्रपती !

नवी दिल्ली :- राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं असलं तरी सत्तानाट्य अद्याप संपलेलं नाही. दरम्यान राज्यातील भाजप सरकारच्या स्थापनेत शरद पवार यांची मूकसंमती असल्याचा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दिलीप देवधर यांनी शरद पवार २०२२ मध्ये एनडीए त्यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत बक्षीस देईल, असे वक्तव्य केले आहे. … Read more

४० वर्षांपूर्वी वसंतदादांना काय त्रास झाला असेल याची अनुभूती शरद पवारांना आली असेल…

मुंबई :- अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. ‘जे पेरले तेच उगवले; स्वत: शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजिर खुपसला होता. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे’,  महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी सत्ता स्थापन केली होती.आता पुतणे अजित पवार यांनीच शरद पवारांच्या … Read more

राष्ट्रवादीने आमदारांना दिल्ली आणि हरियाणातून आणलं परत!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत, संपर्काबाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या चारही  आमदार मुंबईत दाखल झाले आहेत असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. हरियाणातील गुरुग्राममध्ये वास्तव्याला असलेले आमदार अनिल भाईदास पाटील आणि दौलत दरोडा यांना राष्ट्रवादी च्या नेत्यांनी काल रात्री विमानाने मुंबईला आणल. तसेच  आमदार नितीन पवारही काल मुंबईत दाखल झाले. आमदार … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ आमदार शरद पवार यांच्यासोबत

अहमदनगर – राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला. त्याचे धक्के राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात बसले. राजकीय विश्वच हादरून गेले. त्याला कारणही तसेच आहे.  भाजपाने राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. सत्तास्थापनेवेळी अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील 11 आमदार गेल्याचे … Read more

आमदार निलेश लंकेना भेटताच उद्धव ठाकरे म्हणाले …ओळखता आले नाही पण…

मुंबई – ज्या तालुका प्रमुखाची दोन वर्षापूर्वी पक्षातून हकालपट्टी केली. त्याच व्यक्तीची म्हणजेच पारनेर नगर चे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. आणि त्यांच्या साधेपणा व संघटन कौशल्याचे तोंड भरून स्तुती केली. रविवारी रेनी सन्स या मुंबईतील हॉटेलमध्ये हा क्षण इतर आमदारांना अनुभवायला मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना डांबून ठेवलं नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : “भाजपने आमच्या  4 आमदारांना डांबून ठेवलं आहे,” असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी  भाजपा वर केलाय. “भाजपने जे  आमचे आमदार डांबून ठेवले आहेत त्यांच्याशी आम्ही सातत्याने संपर्क करत आहोत.” असेही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्व आमदार सध्या रेनेसन्स हॉटेलमध्ये आहेत. मात्र नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सुरक्षेच्या कारणात्सव रेनेसन्स हॉटेलमधील मुक्काम हलवा … Read more

अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे.  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी आपण राष्ट्रवादीतच आहोत आणि भाजपसोबत मिळून सत्तास्थापन करण्याचं ट्वीट केलं. ‘भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं आहे’, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी ट्विटरवरुन राष्ट्रवादीसोबत असल्याचा दावा केल्यानंतर … Read more

जलसंपदा विभागाची परीक्षा अखेर पुढे ढकलली

औरंगाबाद : राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची २५ व २६ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हजारो परीक्षार्थींना यामुळे दिलासा मिळाला असून आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता एकाच दिवशी परीक्षा होणार होती.  त्यामुळे … Read more

माजी मुख्यमंत्र्यांकडे सापडल्या २६ लाखांच्या जुन्या नोटा

इम्फाळ : मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्या घरावर केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) टाकलेल्या धाडीत तीन वर्षांपूर्वी चलनातून बाद करण्यात आलेल्या २६.४९ लाख रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह आणि इतर लोकांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातच सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकलेला आहे. याबाबतच्या माहितीनुसार, मणिपूरमधील … Read more

सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरावे

भोपाळ : भाजपा आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी आश्चर्यकारकपणे हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने मुंबईतील आपली ताकद दाखवून द्यावी. प्रसंगी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरून लढा द्यावा. कारण या पक्षांपुढे आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी दिली आहे. भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले … Read more

राज्याला आता स्थिर सरकार मिळणार -कोल्हे

कोपरगाव : भारतीय जनता पक्षाचे पहिल्यापासून राज्याला स्थिर सरकार देण्याचे वचन दिलेले होते. त्याप्रमाणे येथील मतदारांनी भाजपा-सेना महायुतीला कौलही दिला होता.  मात्र गेले महिनाभर मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या नाट्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारला पाठींबा देवुन शेतकरी हितासाठी जो निर्णय घेतला त्यामुळे आता स्थिर सरकार मिळणार आहे,असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष … Read more

सरकार दिलेल्या कालावधीतच बहुमत सिध्द करेल -आ. विखे पाटील

शिर्डी : राज्यातील जनतेने भाजप सरकारला बहुमत दिल्याने भारतीय जनता पार्टीचेच सरकार सत्तारुढ होईल हे निश्चितच होते. आता राज्यपालांनी दिलेल्या कालावधीत सरकार आपले बहुमत नक्कीच सिध्द करेल, असा विश्वास माजी गृहनिर्माण मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी टिका करणाऱ्या खा. … Read more

युवकाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

राहुरी: मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशांत उत्तम खांडेकर असे या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील जांभळी येथील १५ वर्षे वयाचा प्रशांत उत्तम खांडेकर हा मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेला होता. त्याच्याबरोबर अनिल खेळणार, अंकुश बाचकर हे देखील होते. मुळा धरणाच्या … Read more

घराच्या कपाटातून चोरटयाने सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवले

संगमनेर: संगमनेर शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरटयांनी धुमाकूळ घालत एच.डी.बी स्व्हिहसेस फायनान्शियल कंपनीचे कार्यालय फोडल्याची घटना ताजी असतानाच शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुन्हा चोरटयांनी धुमाकूळ घालत रायतेवाडी याठिकाणी घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार ४८५ रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केला आहे. त्यामुळे आता … Read more

अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

सांगली : अल्पवयीन विद्यार्थीनीस जबरदस्तीने पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायमूर्तींनी आरोपी महादेव बिरंगे (२६ , ता. तासगाव ) यास दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली . ही घटना नोव्हेंबर २०१५ सालात घडली होती. पिडीता आपल्या कुटुंबियासमवेत तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे राहत होती . या विद्यार्थीनीस आधारकार्ड काढण्यासाठी तासगाव येथे जायचे असल्याने … Read more