रोहित पवार म्हणतात तर संसार नीट कसा होणार?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.  सरकार स्थापनेला होत असलेल्या उशीरामुळे राज्याचा एक नागरिक म्हणून मी चिंताग्रस्त आहे, असं  रोहित पवार यांनी … Read more

वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू

जामखेड :- तीन वेगवेगळ्या घटनांत बालिका, शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. पहिली घटना भुतवडा येथे घडली. शनिवार आदिती हनुमंत मोरे (१२ वर्षे) ही मुलगी आईबरोबर शेतात गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास आईने तिला शेजारी असलेल्या भुतवडा तलावात पाणी आणण्यासाठी पाठवले. ती आपल्या लहान भावंडांना घेऊन पाणी आणण्यासाठी गेली. आदिती … Read more

पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल !

अहमदनगर :- ‘परशुराम सेवा संघ लवकरच व्यापक रूप घेणार असल्याने भविष्यकाळ संघासाठी चांगला राहणार आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार असेल आणि पुढचा मुख्यमंत्री परशुराम सेवा संघाचा असेल,’ असे प्रतिपादन परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे यांनी येथे केले. परशुराम सेवा संघाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक नगरच्या एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क … Read more

कांद्याची सहा हजारांकडे झेप

अहमदनगर : राज्यभरात भीषण दुष्काळ व त्यापाठोपाठ सांगली, सातारा,नाशिकमध्ये आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे उत्पादनच झाले नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शनिवारी अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ५ हजार ६०० रूपये एवढा विक्रमी दर मिळाला. सततच्या भीषण दुष्काळामुळे मेटाकटीला आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी … Read more

नवीन सदस्य बनवण्यासाठी काँग्रेसचे नवे ‘ॲप’

नवी दिल्ली : देशात पाच कोटींपेक्षा अधिक नवीन सदस्य जोडण्याची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी काँग्रेसने एक विशेष ॲप तयार केले आहे. याअंतर्गत आपल्या नवीन सदस्याची विस्तृत माहिती संकलित के ली जाणार आहे. ही माहिती नवीन सदस्याचा वर्ग आणि व्यवसायाच्या आधारे तयार केली जाणार आहे. काँग्रेस सदस्यता अभियानाशी निगडित सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाकडून तयार करण्यात आलेल्या या ॲपचे नाव … Read more

जर तुम्ही पावसात भिजत असाल तर तुम्हाला राजकीय लाभ होतो

मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली होती. त्यामुळे शरद पवारांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांना कोपरखळी मारली आहे. जर तुम्ही पावसात भिजत असाल तर तुम्हाला राजकीय लाभ होतो, असे गडकरी म्हणाले. नुकत्याच संपन्न झालेल्या … Read more

दिल्लीतील प्रदूषणाचे केजरीवालांकडून राजकारण

नवी दिल्ली : दिल्ली व एनआरसीमधील वाढत्या प्रदूषणाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजकारण करत असल्याचा आरोप करत, केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी आप सरकारला लक्ष्य केले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पंजाब व हरियाणाच्या मुख्यमंर्त्यांना पत्र लिहिण्याचे आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना केल्यानंतर जावडेकर यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आरोप-प्रत्यारोपात गुंतणे ही अत्यंत दुर्दैवी बाब … Read more

पत्नीला मारणाऱ्या पतीची जमावाकडून हत्या

बांदा : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात पत्नीची हत्या केल्यानंतर सासरच्या मंडळीला जखमी करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघड झाली. गाझीपूर पोलीस ठाणे हद्दीतील फतेहपूर येथे पत्नीला भेटण्यासाठी छत्तीसगडहून निसार कुरैशी आला होता. बुधवारी त्याने किरकोळ वादानंतर कुऱ्हाडीने सपासप वार करत पत्नीची हत्या केली. यानंतर सासरच्या मंडळीला जखमी करून … Read more

उद्या शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवार, ४ नोव्हेंबरला दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतरच पुढच्या घडामोडींना वेग येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी दिली आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून २५ हजार कोटींची मदत … Read more

..तर शिवसेना सरकार स्थापन करेल

मुंबई : सरकार स्थापन करण्यास जर भाजपा अपयशी ठरली तर राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे. हीच ती वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही, असे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा … Read more

राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतली भेट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्यातील अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीला महत्त्व आले आहे. शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांनी ही भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असला तरी दोघांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा … Read more

आपच्या वतीने श्रीरामपुरात भव्य रास्ता रोको…

श्रीरामपूर- शहरातील विविध भागातील रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत सर्व रस्त्यावर जागोजागी मोठं-मोठे खड्डे निर्माण झालेले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात जमा होऊन रस्त्यातील साचलेल्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले अनेक जीव अपघातात गेले अनेक जन कमी अधिक प्रमाणात अपंग झाले. काही व्यक्ती आजही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत या सर्व प्रकारास घटनेस … Read more

दरोड्याच्या तयारीतील चौघे गजाआड

राहुरी : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करीत गजाआड केले आहे. एक जण पसार झाला आहे. ही कारवाई मुळा धरणाजवळ शुक्रवारी रात्री करण्यात आली. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरारी असलेला अट्टल आरोपी मच्छिंद्र गोरक्षनाथ सगळगिळे … Read more

खासदार डॉ. सुजय विखे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर

साकुरी : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील ग्रामपंचायत सदस्य कै. नारायण गाडेकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते आले होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन अडचणी व शंकांचे निरसन करण्यात येऊन सरकारकडून जलदगतीने भरपाई कशी … Read more

सत्तेचा उपयोग मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी

करंजी : राहुरी- नगर -पाथर्डी मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे मला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, या सत्तेचा उपयोग मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करू, असे प्रतिपादन राहुरीचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांतील मतदारांचे आभार मानण्यासाठी आ. तनपुरे आले असता, चिचोंडी येथे ते बोलत होते. . आ. तनपुरे … Read more

आमदार रोहित पवारांकडून अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील अतीवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या परतीची पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, बाजरी,ज्वारी, कांदा, सोयाबीन, ऊस आदी पिके अतिरिक्त पावसाने वाया गेली आहेत. फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने रानात तुडुंब पाणी साठले असल्याने अनेक पिके … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू- आमदार बबनराव पाचपुते

श्रीगोंदा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे केवळ हालच झाले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण स्वत: उभे आहोत. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण व अडीअडचणी समजून घेण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात आपल्या सुचनेवरून तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ.पाचपुते बोलत होते. ते … Read more

जनशक्तीचा अगदी थोड्या मतांनी पराभव : घनश्याम शेलार

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभेच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केल्याने या निवडणुकीत जनशक्तीचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला. जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला आहे. निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी तालुक्यातील जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी काल श्रीगोंद्यात पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणूक निकालानंतर शेलार पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेसाठी … Read more