भाजप-सेनेतील वादाबाबत आण्णा हजारे म्हणतात…

पारनेर :- राज्यात भाजप-सेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष केवळ सत्ता व पैशांसाठी असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी केली. राज्यात सत्तास्थापनेबाबत भाजप व सेनेेमध्ये एकमत होत नसल्याचे हजारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणुकीत तर त्यांनी गळ्यात हात टाकले होते ना? मग आता भांडण कशासाठी सुरू आहे? याचा अर्थ … Read more

नगर विकासाचे नवे धोरण राबविणार – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- प्रामाणिक पणे कार्य केले तर जनतेची साथ भेटतेच, नगरचा सर्वागीण विकास हेच स्वप्न बाळगून या पुढे कार्य करणार असून जितोच्या ट्रेड फेअरने नगरच्या उद्योजकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून राज्यात नावलोकिक प्राप्त केले. प्रथमच अतिशय भव्य असा ट्रेडफेअर उत्तम नियोजनामुळे यशस्वी झाला असून जितो संघटनेच्या सहकार्याने नगर विकासाचे नवे धोरण राबविणार असल्याचे मत नवनिर्वाचित … Read more

नवे आमदार शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून येणार ?

अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार डाॅ. किरण लहामटे सध्या सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानत ते सत्कार स्वीकारत आहेत. बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीला ते वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. डाॅ. लहामटे दुपारनंतर मुंबईला रवाना झाले. ते सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले, पण तोपर्यंत … Read more

उद्यापासून बँकांचे हे नियम बदलणार !

नवी दिल्ली :- उद्यापासून बँकांचे नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकांच्या कामाच्या वेळा, व्याजदर यात बदल झाले आहेत. या नियमांमुळे तुमच्या पैशांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी काही राज्यांमध्ये सरकारी बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ बदलणार आहे. 1. तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर 1 नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचा व्याजदर बदलणार आहे. बँकेच्या 42 कोटी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैशाच्या वादातून एकाचा निर्घुण खून,गावात तणावाचे वातावरण

जामखेड : तालूक्यातील खर्डा गावातील बाळू बजरंग पवार यांची पैशाच्या वादातुन तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली. गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन अहमदनगरहुन पोलिस फौजफाटा गावात दाखल केला आहे. तसेच खर्डा शहर आज बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंतच मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी … Read more

खात्रीलायक सूत्रांची माहिती, सत्तास्थापनेसाठी भाजपाला ईडी देणार पाठिंबा!

मुंबई :- मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामुळे राज्यात सत्तास्थापनेला उशीर होताना दिसत आहे. यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘ब्रेकिंग न्यूज… सत्ता स्थापण्यासाठी भाजपाला ईडीचा पाठिंबा,’ असं उपहासात्मक ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ईडीमुळं महाराष्ट्राचं अवघं … Read more

मोटारसायकल घसरल्याने आमदार नीलेश लंके जखमी

Nilesh Lanke

पारनेर | मोटारसायकल घसरल्याने आमदार नीलेश लंके किरकोळ जखमी झाले. त्यांनी मंगळवारी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात पायाला झालेल्या जखमेवर उपचार करून घेतले. आमदार झालो, तरी आपण सामान्य कुटुंबातीलच आहोत, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले. सोमवारी मतमोजणी सुरू होती, त्यावेळी लंके हे आपल्या घरीच होते. मतांची आघाडी वाढत असल्याने कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर ते मोटारसायकलीवरून सुप्याला निघाले. काही … Read more

महाराष्ट्रात आलाच आहात तर नुकसानीची पाहणीही करा !

संगमनेर | भाजप विधिमंडळाच्या नेता निवडीसाठी केंद्रीय कृषिमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आल्यासरशी त्यांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात जात शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, असा टोमणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मारला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना उद्देशून तांबे यांनी आपल्या टि्वटर आणि फेसबुकवर हात जोडत आणि पाया पडत ही मागणी केली. मागणी … Read more

12 – 0 च्या अपयशावर खासदार डॉ.सुजय विखे म्हणतात ….

अहमदनगर :- जिल्ह्यात 12-0 हा नारा उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी दिला होता. पण आम्हला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही.अपयश का आले ? याची कारणे शोधले जातील.आत्मपरीक्षण करण्याची आमच्या सर्वांना गरज आहे. या निकालापासून मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. एक ते दोन महिन्यात जिल्ह्यातील अपयशाचे सर्व कारणे शोधले जातील असे खासदार डॉ.सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. … Read more

जिओचा ग्राहकांना दणका,ही सुविधा केली बंद !

मुंबई :- अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओनं ग्राहकांना दणका दिला आहे. जिओच्या पोर्टफोलियोमध्ये सर्वांत जास्त चर्चित 1.5 जीबी डेटा दररोज आणि 2 जीबी डेटा दररोज असा प्लान आहे. जिओच्या पोर्टफोलियोमध्ये काही अन्य प्लान देखील आहेत. ज्यातून काहींमध्ये जिओ टॉक टाइम देते. जिओनं ग्राहकांना आणखी एक झटका दिला आहे. ज्याच्या अंतर्गत आता … Read more

श्रीगोंदा तालुक्याला परत एकदा लाल दिवा मिळणार का ?

श्रीगोंदा : अतिशय चुरशीच्या झालेल्या श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपचे बबनराव पाचपुते यांनी आघाडी मिळवली आणि पाचपुते हे अटीतटीच्या लढाईत विजयी झाले. पाचपुतेंच्या विजयामुळे श्रीगोंद्यात पहिल्यांदाच विधानसभेला कमळ फुलले आहे. निकाल लागल्यानंतर बबनराव पाचपुते व त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते या दोघांनी तातडीने मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील … Read more

दिवाळीसाठी गावी येणाऱ्या तरुणांचा अपघातात मृत्यू, गावावर शोककळा

बोधेगाव :- दिवाळी सणासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी कपडे तसेच फराळ घेऊन दुचाकीवरून पुण्यावरून आपल्या मुळ गावी परतत असताना पुणे-नगर महामार्गावर सुपा येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मध्यरात्रीच्या सुमारास दिलेल्या धडकेत बोधेगाव येथील दोन कुटुंबांतील दोघा नवतरुणांचा जागीच करुण अंत झाला. विशेष म्हणजे दोघेही त्यांच्या कुटुंबांतील एकुलते एक मुलगे होते. येथील संकेत अशोक शिंदे (वय २१) … Read more

मोदींच्या दौऱ्यासाठी हवाई हद्द वापरण्यास दिला नकार !

इस्लामाबाद :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवाई हद्दीतून विमान नेऊ देण्याची भारताची विनंती पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. मोदींच्या आगामी सौदी अरेबिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेजारी राष्ट्राकडे ही परवानगी मागण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या हवाई मार्गे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सरकारचा हा निर्णय जाहीर केला. अशा प्रकारची परवानगी दिली जाऊ शकत नाही. … Read more

पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह ७२ तासांनंतर सापडला

नेवासे :- ज्ञानेश्वर मंदिरामागील कापूरडोह येथे प्रवरानदीत गुरुवारी वाहून गेलेल्या सोमनाथ गांगुर्डे (३०, मारूतीनगर) या तरुणाचा मुतदेह ७५ तासांनी रविवारी दुपारी नदीपात्रात सापडला. मुसळधार पाऊस व मुळा धरणातून सोडलेले पाणी यामुळे आलेल्या पुरामुळे मुळा व प्रवरा नदीवरील तिन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाले होते. १५ सप्टेंबरनंतर सर्व फळ्या टाकल्याने बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला होता. पुराच्या पाण्यात गुरुवारी … Read more

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांचा सत्कार

श्रीरामपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात सहा जागांवर विजय मिळवून पक्षाची जिल्ह्यात ताकद सिद्ध केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यात डॉ. किरण लहामटे, कोपरगावात आशुतोष काळे, राहुरीत प्राजक्त तनपुरे, नगरमध्ये संग्राम जगताप, पारनेरमध्ये नीलेश लंके, तर नेवाशात राष्ट्रवादी पुरस्कृत शंकरराव गडाख विजयी झाले. राष्ट्रवादी … Read more

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार

श्रीरामपूर :- शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील बाजूस चारचाकी वाहनात लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केला व ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने २७ वर्षीय युवतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  शहरात खासगी नोकरी करणाऱ्या युवतीने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत तिने म्हटले आहे,  डिसेंबर २०१८ पासून ते … Read more

निकालानंतर आ.संग्राम जगताप यांनी घेतली गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची. केडगाव हत्याकांडात … Read more

कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने बाळासाहेब मुरकुटेंचा पराभव !

नेवासे :- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख विरोधक एकत्र येत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना विजयी केले होते. मात्र मुरकुटे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना वारेवर सोडत कोणतेही बळ न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून असलेली खदखद या निवडणुकीत बाहेर पडली. मुरकुटे यांच्या विजयात कार्यकर्ते नडले असल्याच्या चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. मुरकुटे यांनी तालुक्‍यात … Read more