अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात १ लाख कोटींचा निधी आणला, असा दावा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
गांधी म्हणाले, भाजपचा खासदार म्हणूनच मी निवडूण आलो.केवळ जैन समाजाचा नाही, तरसर्व समाज, संघटना व जनतेने मला पाठबळ दिले.यापुर्वीही मी हे स्पष्ट केलेले आहे.

मात्र जैन समाजाचा अपमान झाल्याचे सांगत काही जणांचे माझ्यावरचे प्रेम उफाळून आले. पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली.
काही निर्णय राजकीय दुष्टीकोनातून घ्यावे लागतात. पक्षाने ते घेतले.त्यातून डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली.पक्षाच्या या निर्णयाशी मी सहमत आहे. जे होते ते चांगल्यासाठीच होते.
पत्रकार परिषदेसाठी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, भैय्या गंधे, किशोर बोरा उपस्थित होते.
- लॉटरीत मिळालेलं म्हाडाचे घर विक्रीबाबत नियम काय आहेत ? वाचा सविस्तर
- मुंबईहुन ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन !
- मुंबईकरांसाठी खुशखबर ! शहरात सुरू झाली ई – बाईक टॅक्सी सेवा, ‘या’ 3 कंपन्यांना मिळाले तात्पुरते परवाने, भाडे किती असणार?
- यात्रीगण कृपया ध्यान दे….! अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, मध्य रेल्वेची अधिसूचना निघाली
- नवीन व्यवसाय सुरू करायचाय ? मग 3 लाख रुपयांमध्ये मोबाईल दुकानाचा व्यवसाय सुरू करा, पहिल्या दिवसापासून होणार कमाई