अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते.
याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून उद्योजकांना त्रास देतात. उद्योग बंद करण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भिती निर्माण होते.
नंतर प्रकरण मिटवण्यासाठी निरोप पाठवला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. एकीकडे शासन उद्योगवाढीचे धाेरण राबवत आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे मस्तवाल जर असे उद्योग करत असतील, तर नवीन उद्योगांना खीळ बसेल, असे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! शिक्षण विभागाच्या नव्या आदेशाने शालेय विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
- मुंबई – आग्रा महामार्ग प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! महामार्गाचा ‘हा’ टप्पा सहापदरी होणार, नितीन गडकरींची माहिती
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट ! Old Pension Scheme लागू होणार की नाही ? सरकारने अखेर मौन सोडल
- राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, 3 अपत्य असतानाही मिळणारा ‘हा’ लाभ
- राज्यातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी मिळणार मोठी भेट ! नोव्हेंबर , डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर