जामखेड :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. यापुढे ते हेच करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांनी चोंडीला भेट देऊन स्मृतिस्तंभास अभिवादन केले. पालकमंत्री राम शिंदे यांनी घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला.

पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, भाजप हटवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी हा काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. ते घाबरले आहेत.

मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. त्यामुळे ते वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभेसाठी प्रस्ताव दिला आहे का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, तसा प्रस्ताव आलेला नाही. वृत्तपत्रे व वाहिन्यांवर चर्चा चालू आहे.
त्यांच्याकडे जायचे कशासाठी? वंचितसाठी काय अजेंडा त्यांच्याकडे आहे? अजेंडा असल्याशिवाय काही शक्य नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
- सोनं पुन्हा चमकलं ! 19 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
- ब्रेकिंग ! आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- सरकारच्या योजनांचा लाभ पारधी समाजापर्यंत थेट पोहोचवा, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे निर्दैश
- अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याचे २७ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन
- सायकलवर घराकडे निघालेल्या इसमाचा कोल्हार पुलावर ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार