नवी दिल्ली – देशातील कांदा उत्पदकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून निर्यात अनुदानाची मुदत आणखी सहा महीन्यांकरिता वाढवून द्यावी आशी मागणी खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली.
संसदेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात खा.डाॅ सुजय विखे पाटील यांनी शून्य प्रहरात कांदा उत्पादकांच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि अर्थिक संकटाला तोंड आहे.अडचणीवर मात करून शेतकर्याना कांद्याचे उत्पादन हाती आले असताना न मिळणारा भाव आणि निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे शेतकर्यांवर संकटात सापडला आहे.
या प्रश्नावर आज खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले,याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,सध्या उत्पादीत केलेल्या कांद्याला निर्यात करण्याची परवानगी दिली तर शेतकर्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल.सरकारने मागील काही दिवसांपासून निर्यात अनुदान बंद केल्याने शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
त्यामुळेच निर्यात अनुदानाची मुदत सहा महीने वाढविल्यास शेतकर्याना त्याचा निश्चितच लाभ होईल याबाबत केद्र सरकारने गांभीर्याने विचार करून निर्णय करावा आशी मागणी खा.डाॅ.विखे पाटील यांनी केली.
- सोन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सोन्याचा फुगा अखेर फुटणार , 2026 मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार
- Tata Sierra SUV हफ्त्यावर खरेदी करण्याचा विचार करताय ? मग किती डाउन पेमेंट करावं लागणार, संपूर्ण गणित समजून घ्या
- सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निकाल ! वन जमिनीवर शेती करता येणार की नाही ? स्पष्टच सांगितलं
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्युज ! सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार, नवीन वर्षात…..
- मुंबईत तयार होतोय सर्वात महागडा स्कायवॉक ! कुठे विकसित होतोय सर्वाधिक मोठा आणि महागडा स्कायवॉक ? पहा…