अहमदनगर :- नगर – कल्याण रोडवरील उड्डाणपुलाखाली सागर छबूराव साळवे (रा.बुऱ्हाणनगर) या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली.
गोवा एक्सप्रेस रेल्वेखाली सापडून साळवेचा मृत्यू झाला. सागर याने आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा झाला नाही.
सागर याचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला एक दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, 1 भाऊ पत्नी असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे हे. कॉ. देशमुख तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करुन रेल्वे पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 3 प्रॉफिटेबल बिजनेस ! एकदा सुरु झालेत की लाखोंची कमाई होणार
- बातमी कामाची ! महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, सलग इतके दिवस बँका बंद राहणार
- तुमच्या पत्नीच्या नावाने पोस्टाच्या योजनेत दरमहा 8,000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळणार 5 लाख 70 हजार 927 रुपये
- वाईट काळ संपला ! 20 ऑक्टोबर पासून ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार
- महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थकीत हफ्ता, बोनसही झाला मंजूर