कर्जत : तालुक्यातील नेटकेवाडी येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, पोलिसांनी आठ लोकांना अटक केली आहे.
तालुक्यातील नेटकेवाडी येथे आज सकाळी ९:०० च्या सुमारास गावात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. याबाबत अजय बापू धांडे व गहिनीनाथ भिवा धांडे यांनी परस्परविरोधांत तक्रारी दाखल केल्या आहेत.

अमर बापू धांडे (वय २३) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत सुदाम भिवा धांडेंसह १४ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, वडील बापू धांडेंसह आपल्या डोळ्यांत चटणी टाकून गजाने, काठीने व दगडाने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.
आपण वडिलांसह पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो असताना मागे बहीण व आईला पाच सहा महिला- पुरुषांनी घरात घुसून मारहाण करत गळयातील सोन्याची चेन काढून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून कर्जत पोलीस स्टेशनला १४ लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेटकेवाडी येथील गहिनीनाथ भिवा धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बापूराव धांडे यांच्यासह इतर १० व्यक्तींनी डोळयांत चटणी टाकून गजाने, काठीने व दगडाने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.
या वेळी गळयातील चेन व मोबाईल हिसकावून घेतला. तर महिलांना घरात घुसून मारहाण केली. यावरून कर्जत पोलीस स्टेशनला १० ज़णांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- वाईट काळ संपला ! 20 ऑक्टोबर पासून ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार
- महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थकीत हफ्ता, बोनसही झाला मंजूर
- 10% मुंबई आहे बापाची ! ‘हे’ कुटुंब आहेत मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार, 3400 एकर जमिनीचे मालक
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ दोन वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणार 750 रुपयांची शिष्यवृत्ती
- …….तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार !