अहमदनगर :- भाजप प्रणित मोदी सरकारच्या हुकुमशाही निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था अनागोंदीत सापडल्याचा पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात निषेध नोंदविण्यात आला.
तर अर्थव्यस्थेसाठी वारंवार धोक्याचा इशारा देणारे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना इंडियन लॉरिस्टर अगेन्स्ट गव्हर्नन्स इन्ट्रॉपी सन्मानची मानवंदना देण्यात आली.

यावेळी अॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, किशोर मुळे, पोपट भोसले, नामदेव अडागळे, शिवाजी पालवे, संदिप पवार, शांता ठुबे, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, शारदा गायकवाड, मुजावर बेगम, जयश्री भुजबळ, शबाना शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशात आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. अनेक युवकांना नवीन नोकर्या तर मिळाल्या नाहीत, उलट असलेल्या नोकर्या घालवण्याची वेळ या मंदीमुळे आली आहे. सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत आहे. देशातील आर्थिक तज्ञांच्या मदतीने हे संकट दूर करण्याची गरज आहे.
मागील पंचवार्षिकला घोषणा करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ अद्यापि सर्वसामान्य घरकुल वंचितांना मिळाला नाही. गाईडेड लॅण्ड डेव्हलपमेंट तंत्र म्हणजेच हायब्रीड लॅण्ड पुलिंगद्वारे घरकुल वंचितांच्या जागेचा प्रश्न सुटणार आहे. मात्र सरकारकडे मुलभूत सोयी, सवलती व योजना अंमलबजावणी इच्छाशक्तीचा अभाव असल्याने ही योजना कार्यान्वीत होताना दिसत नाही.
जागेअभावी अडीच लाखाचे अनुदान धनदांडग्यांना वाटले जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. महात्मा गांधींच्या तत्व व विचारांनी काम करणार्या समविचारी व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने इंडियन चेंबर्स ऑफ लॉरिस्टर्स संघटना उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
- शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता
- सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान ! ‘या’ प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण
- एसबीआय, एचडीएफसीसह सर्वच खाजगी आणि सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 नोव्हेंबर 2025 पासून ‘हा’ नियम बदलणार
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी Good News ! ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मिळणार डबल बोनस
- पोस्टाची ‘ही’ योजना बनवणार लखपती ! 5 वर्षात मिळणार 5 लाखांचे व्याज, कोणाला करता येणार गुंतवणूक?