नेवासा :- ‘मी चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये.
माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला काही मागायचे नाही तुम्हाला पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे,’ असे भावनिक आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.

गडाख अलीकडेच आजारपणातून सावरले आहेत. त्यानंतर त्यांची ही पहिलीच मोठी सभा होती. त्यामध्ये त्यांचे आक्रमक रूप पहायला मिळाले.
सोनई येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा मेळावा यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यांचे चिरंजीव माजी आमदार शंकराव गडाख यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा घेण्यात आला.

यावेळीही गडाख कोणत्यात पक्षात न जाता आपल्या शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फेच निवडणूक लढविणार आहेत.
त्यानंतर ज्या पक्षाची सत्ता येईल, त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणाही या मेळाव्यात करण्यात आली.
तालुक्यात पाण्याची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. अनेक पिके जळून गेली, जर पाऊस आला नसता, तर काय अवस्था झाली असती.
आपलं पाणी खाली चालले आहे आता तर सुमारे २ टीएमसी पाणी बीडला देण्याचा निर्णय झाला आहे. यावर तालुक्याचा आमदार काही बोलत नाही.
शंकरराव आमदार असताना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी व अकोले तालुक्यात धरणे बांधली जात असताना आपल्याच सरकारचे ज्येष्ठ मंत्री पिचड यांच्याशी वाईटपणा घेतला.
आगामी निवडणुकीत पाणीप्रश्नांवर लढणाऱ्याला विधानसभेत पाठवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
- शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! पुणेकरांची प्रतीक्षा वाढणार, मार्च 2026 ची डेडलाईन पण….
- गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘ही’ कंपनी देणार 23 मोफत शेअर्स, रेकॉर्ड डेट काय ?
- आठव्या वेतन आयोगाबाबत आतली बातमी ! नव्या आयोगात थकबाकीचा लाभ 5 हप्त्यांमध्ये दिला जाणार ? वाचा सविस्तर
- Soybean Market : अखेर सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ, ‘या’ बाजारात मिळाला सर्वाधिक भाव
- पुण्यातील रेल्वे प्रवाशांना बसणार आर्थिक फटका ! ‘या’ वंदे भारत एक्सप्रेस च्या तिकीट दरात मोठी वाढ, नवीन तिकीट दर….