बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत.
छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली.

मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला, असा घणाघात धनंजय मुंडेंनी केला.
विनायक मेटे महजनादेश यात्रेच्या बसवर चढले आणि खेळ झाला. मंत्री रुसून गेल्या, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली.
जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले. इथे रोजगार नव्हता म्हणून ते गेले. आष्टीचं बेणं भाजपात गेलं, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
“शरद पवार साहेबांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासह अन्य मागासवर्गीय नेत्यांना खुल्या जागेतून आमदार- खासदार केलं. भाजपचं आता विभाजन झाले आहे.
ज्या बबनराव पाचपुते यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले, त्यांनाच भाजपात घेऊन पवित्र केलं. मुख्यमंत्री आधी बबन्या म्हणायचे, आता बबनराव पाचपुते असं नाव घेतात”, अशी टोलेबाजी धनंजय मुंडे यांनी केली.
- केंद्रीय कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली गुड न्यूज ! ‘या’ तारखेला Pm Kisan चा 21 वा हफ्ता जमा होणार, नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार
- पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! ‘या’ धरणावर तयार होणार आठपदरी पूल, 82 गावांमधील नागरिकांना होणार फायदा
- ‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 31 टक्क्यांपर्यंत रिटर्न ! 12 महिन्यातच गुंतवणूकदार होणार श्रीमंत
- 2005 च्या हिंदू वारसा (दुरुस्ती) कायद्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास मुलीला मालमत्तेत वाटा मिळतो का ? सुप्रीम कोर्टाचे आदेश काय सांगतात?
- मध्य रेल्वेचे महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठे गिफ्ट ! ‘या’ जिल्ह्यातुन चालवची जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन