मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी एकूण दीडशेच्या वर साक्षीदार साक्ष देण्यास तयार झाले असून सध्या त्यांच्या जबान्या नोंदवून घेण्याचे काम पोलीस अधिकारी करीत आहेत.
हे साक्षीदार या बँकेचे घटक असून त्यांनीच बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील अनेकांना कर्जाचे वाटप केले होते. कोणाकोणाला या कर्जाची रक्कम मिळाली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

आरोपींत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे. या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्याचा तपास मुंबई अन्वेषण विभागाच्या आर्थिक घोटाळा शाखेचे अधिकारी करीत आहेत.
- म्हातारपणात पण पैशांची तंगी भासणार नाही! Post Office च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळणार 20 हजार रुपये व्याज
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील पाणी पुरवठा 30 ऑक्टोबर रोजी बंद राहणार, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
- तुमच्या मालकी जमिनीवर विजेचा खांब गाडलेला असेल तर मोबदला मिळणार का ? कायदा काय सांगतो ?
- इलेक्ट्रिक कारच्या चाहत्यांसाठी गोड बातमी ! लाँच होणार ‘या’ 5 नवीन Electric Cars
- रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय ! ऐतिहासिक निर्णयाचा फायदा होणार की तोटा ? वाचा सविस्तर













