सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावल्यामुळे धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी शनिवारी बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणात शनिवारी सायंकाळी १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी आहे. शुक्रवारी धरणाचे सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी वर उचलून त्यातून विनावापर पुर्वेकडे पाणी सोडण्यात येत होते.

परंतु पाऊस मंदावला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाल्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणि विसर्ग २१०० क्युसेक ठेवण्यात आला आहे. धरणातील पाणीपातळी २१६३.०२ फूट झाली आहे. दिवसभरात कोयनानगर १ एकुण ६९२७, नवजा ४ एकूण ८०५७ आणि महाबळेश्वर येथे ६ एकूण ६९९२ मि. मी. पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.
- सोनं पुन्हा चमकलं ! 19 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
- ब्रेकिंग ! आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- सरकारच्या योजनांचा लाभ पारधी समाजापर्यंत थेट पोहोचवा, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे निर्दैश
- अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याचे २७ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन
- सायकलवर घराकडे निघालेल्या इसमाचा कोल्हार पुलावर ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार