नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली.
‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने नगरमधील खोट्या अफवा बंद झाल्या आहेत,’ असेही त्यांनी कोणाचेही नाव न घेता आवर्जून स्पष्ट केले.

नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म घेवून नगरला राठोड आल्यावर केडगावकरांनी रंगोली चौकात त्यांचे स्वागत केले. या वेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, ‘नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार आहे.
नगर शहराचा विकास शिवसेनाच करणार, हा विश्वास जनतेला आहे. ज्यांनी पाच वर्षात नगरकरांना फक्त विकासाचा गप्पा आणि थापा दिल्या, त्याही बंद होतील.’
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, आता महिलांना …..
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% कधी होणार ? 3% DA वाढीबाबत समोर आली मोठी अपडेट
- पैसाच पैसा….; 2026 मधील संपूर्ण 12 महिने ‘या’ राशीच्या लोकांची चांदी होणार, शनी देवाच्या कृपेने मिळणार जबरदस्त यश!
- लातूर – कल्याण महामार्ग ‘या’ 6 जिल्ह्यांमधून जाणार ! कोणत्या गावांमधून जाणार नवा मार्ग ? समोर आली मोठी अपडेट
- पैशांची चिंता सोडा! एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि आयुष्यभर मिळवा 100000 रुपये पेन्शन