राहुरी : राहुरी मतदारसंघाच्या विकासाकरिता आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा, असे आवाहन अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी तालुक्यातील डिग्रस, मुळानगर, तमनर आखाडा, देसवंडी, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, वळण, केंदळ आदी भागात सौ. कर्डिले यांनी महिला व कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी काढली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

सौ.कर्डिले म्हणाल्या, की गेल्या अनेक वर्षांपासून आ.कर्डिले यांनी स्वत:च्या कुटुंबाकडे एव्हढे लक्ष दिले नाही, इतके जनतेच्या विकासाला व सामान्य कार्यकर्ते, माणसाला दिले. मतदारसंघातील समस्या त्यांनी सोडविल्या.
गेल्या पाच वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक कामे झाली असून, पुढील काळात देखील उर्वरित कामे होतील. सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता पुन्हा एकदा आ.कर्डिले यांनाच मत द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
- सापांची भीती वाटते का ? मग घरात ‘हे’ औषधी तेल असायलाच हवे, सापांचा धोका होणार कमी
- 3 वेळा बोनस शेअर देणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल ! एक लाखाचे झालेत एक कोटी
- 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार मोठी भेट ! ‘ही’ मागणी होणार पूर्ण
- लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट
- ‘हे’ आहेत देशातील सर्वात महागडे वकील ! एका केससाठी किती फी घेतात ?