दिवाळीत प्रवास होणार सुखकर; प्रवाशांसाठी २५ जादा बस धावणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेले अनेक महिने बस प्रवास बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वरत होतांना दिसत असल्याने पूर्ण क्षमतेने एसटी बस सुरु करण्यात आली आहे.

यातच वर्षाचा सण दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

दीपावली सणानिमित्ताने दरवर्षीच राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. नियोजन यंदाही राज्यभर करण्यात आलेले असून अहमदनगर विभागाने सुरवातीच्या टप्प्यात फक्त 25 बसचे नियोजन केलेले आहे.

त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर जादा बस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या जादा बस पुणे, मुंबई, कल्याण, नाशिक, बीड आदी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत.

या जादा बससाठी आरक्षणची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान एकाच दिवशी 100 जादा बस सोडल्या जात आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने

प्रवाशांची होणारी गर्दी कमी लक्षात घेऊनच जादा बस कमी सोडण्यात आलेल्या असल्या तरी प्रवाशांची गर्दी वाढल्यानंतर तातडीने जादा बस सोडण्याची आखणी अहमदनगर विभागातर्फे करण्यात आलेली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment