खेळाच्या वादातून आठ जणांकडून दोघांना बेदम मारहाण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया कारखान्याच्या क्रिकेट मैदानावर रविवारी क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून आठ जणांनी मिळून दोघा खेळाडूंना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी अतुल विनायकराव लोंढे यांच्या फिर्यादीवरून संजय सुभाष जाधव, अभिजित दीपक जाधव, मंजाहारी सुभाष जाधव, भूषण दीपक जाधव, नामदेव शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही), संदीप सुरेश जाधव, विठ्ठल बाळासाहेब जाधव,

जय संजय जाधव (सर्व रा. वारी, ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वरील आठ जणांच्या टोळक्याकडून झालेल्या

मारहाणीतखेळाडू अतुल विनायकराव लोंढे (वय ३८) व संगीत विनायकराव लोंढे (वय ३५, दोघे रा. बाभूळगाव खुर्द, ता. येवला, जि. नाशिक) हे जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वारी येथे २३ मार्चपासून मच्छिंद्र टेके मित्रमंडळाच्या वतीने विवेकभैया कोल्हे चषकाच्या क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या.

रविवारी या चषकातील सामन्याचा अंतिम दिवस होता. या स्पर्धेत मारहाण झालेल्या खेळाडूंचा सेमी फाइनलचा सामना सुरू होता. यादरम्यान नाशिक क्रिकेट टीमचा खेळाडू अशोक साहेबराव गुंजाळ (रा. येवला, जि. नाशिक) यावर संजय सुभाष जाधव याने संशय घेतला.

त्यावर नाशिक टीमचे अतुल लोंढे हे पंचाशी बोलत असतानाच संजय जाधव याने अतुल व त्यांचे भाऊ संगीत लोंढे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या वरील उर्वरित सात जणांनी ग्राउंडवर पळत येत बॅट व स्टंपने दोघांना मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र म्हस्के करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!