श्रीगोंदे :- तालुक्यातील अजनुज, आर्वी, पेडगाव परिसरात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळूउपसा होत असल्याचे दिसताच येथील तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने एकूण ८ बोटी जिलेटीनने उडवून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल बुधवारी नष्ट केला.
अजनुज, आर्वी व पेडगाव या नदीकाठच्या गावांत नदीपात्रातून विनापरवाना राजरोस वाळूउपसा होत असल्याचे माहिती तहसीलदार माळी यांना समजताच महसूलचे पथक पोलिस कर्मचाऱ्यांसह नदीपात्रात गेले. आठ बोटींच्या साह्याने वाळूउपसा सुरू असल्याचे त्यांना दिसले.

महसूलचे पथक दिसताच वाळूउपसा करणारे पळून गेले. या पथकाने तस्करांच्या ८ बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उडवून दिल्या. सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
कारवाईसाठी गेलेल्या पथकात पेडगावचे मंडल अधिकारी अजबे, प्रशांत सोनवणे, सतीश घोडेकर, दादा टाके, उत्तम राऊत, प्रताप देवकाते, किरण बोराडे यांचा समावेश होता.
- श्रावणात एकाच वेळी तयार होतोय 3 दुर्मीळ योग! मिथुन, कर्कसह ‘या’ राशींना मिळणार जबरदस्त लाभ
- प्रेमभंग असो किंवा मैत्रीतील विश्वासघात…, भूतकाळातील गोष्टी मागे सरता सरत नाहीत? वाचा प्रेमानंद महाराजांचा अमुल्य सल्ला!
- फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये धमाका! Samsung ते Motorola…, 50MP कॅमेरासह टॉप-5 स्मार्टफोन अवघ्या ₹8000 मध्ये
- जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा कोपरगाव तालुक्यात छापा, अवैध वाळू, दारुसह ६२ लाखांचा मुद्देमाल पकडला
- पारनेरची माती ही कसदार साहित्यिकांची खाण, खासदार निलेश लंके यांचे प्रतिपादन