अहमदनगर ब्रेकिंग ! जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून बाधितांची आकडेवारीमध्ये वाढ होतच आहे.

याला रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच यामध्ये दरदिवशी काहीतरी नवीन नियम करण्यात येत आहेत.

नुकतेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश काढला आहे. करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत.

गर्दी टाळण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती 18 हे रोजी मध्यरात्री पासून 31 मे अखेर पूर्ण बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे.

पहा व्हिडीओ –

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News