कर्जत :- भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना अच्छे दिन’चे गाजर दाखवून देशाची व राज्याची सत्ता काबीज केली.
पण सामान्य माणूस, शेतकरी, व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातत मूलभूत सुविधांची समस्या आहे.

सीतपूर गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा टँकर पोहोचत नाही.
हे अच्छे दिन नसून आतापर्यंतचे सबसे बुरे दिन’ आहेत, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.
पाण्याचा टँकर नियमित येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. जगताप म्हणाले, खोटारड्या लोकांनी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला.
नुसत्याच योजनांच्या घोषणा केल्या, पण अंमलबजावणी केली नाही. पाच वर्षांत नोटबंदी, आरक्षण, कर्जाच्या समस्यांमुळे सर्वांना खूप त्रास झाला.
- घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग 50 : 30 : 20 चा फॉर्म्युला वापरा, कधीच आर्थिक तंगी भासणार नाही
- खराब सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाहीये का ? मग ‘या’ टिप्स फॉलो करा अन Cibil Score सुधारा
- Mumbai Local Train : मुंबईत कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक एसी लोकलच्या १३ फेऱ्या रद्द, प्रवाशांची मोठी गैरसोय
- ओंकारच्या यशाने निंबळक मध्ये आनंदोत्सव…! तरुणांना प्रेरणादायी यश : मेहेत्रे
- Jeans Washing Tips : जीन्स पँट धुताना रंग फिकट होतो का ? ‘या’ टिप्स फॉलो करा आणि पैसे वाचवा…