६० तास उपाशी राहून प्रवास करणाऱ्या मजुराचे निधन

Published on -

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर या आपल्या गावी श्रमिक रेल्वेद्वारे निघालेल्या मजुराचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्रवासात आम्हाला खायला – प्यायला काहीच मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यूझाल्याचा आरोप मृताचा पुतण्या रवीश यादव याने केला आहे. रवीश यादव म्हणतो, माझ्या काकांना प्रवासात काहीही न मिळाल्याचा त्रास होत होता.

त्यांना कमालीच्या वेदना होत होत्या. वाराणसीला ट्रेन पोहोचण्यापूर्वी अर्धा तास ते चक्कर येऊन पडले आणि काही मिनिटातच निधन झाले.

रेल्वेच्या प्रवासात जेवणाची पाकिटे देण्यात येतील. तसंच पाणी देण्यात येईल असे आम्हाला सांगण्यात आले होते, पण आमच्या बोगीत काहीच मिळाले नाही.

आमच्या बोगीतील अन्य प्रवाशांनी खायला तसेच प्यायला काहीच न मिळाल्याची तक्रार केली, पण कोणीच आम्हाला मदत केली नाही. ट्रेनमध्ये पाणीच नव्हते.

हे दोघे बांधकाम मजूर उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर या आपल्या गावी निघाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनसहून ते प्रवास करीत असलेली श्रमिक स्पेशल 20 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता निघाली आणि ती वाराणसी कँटोनमेंटला 23 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News