अहमदनगर :- नगर दक्षिणेतून निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी लगेच कामाचा तडाखा सुरू केला आहे.
परंतु कामे करतांना मात्र त्यांनी राजशिष्टाचाराला अक्षरशः हरताळच फासल्याचा प्रचार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुरुवारी खा.सुजय विखे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमधील त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली.

अर्थात लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेत बैठक घेण्यासाठी सभागृहासह समिती सभागृह असतांना तेथे बैठक न घेता खा.डॉ. विखे यांनी अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये बैठक घेतली.
तीही थेट अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून घेतल्याने अधिकाऱ्यांसह सभापतींनी ही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान खा.डॉ. विखे हे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे सुपुत्र असले तरी राज शिष्टाचाराचे पालन होणे आवश्यक आहे. परंतु त्याचा विसर खा. डॉ. विखे यांना पडला असल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामे मार्गी लागावीत या हेतूने खा. डॉ. विखे यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची एकत्रित बैठक घेतली.

अर्थात खासदार म्हणून डॉ. विखे यांना ही बैठक जिल्हा परिषदेतील समिती सभागृहात घेता आली असती. जिल्हा परिषदेत तीन समिती सभागृह आहेत.
परंतु तेथे बैठक न घेता त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये घेतली. एवढे नाही तर थेट अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीला अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर यांच्यासह काही सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे दोन्ही सभापती या बैठकीला उपस्थित असतांना एकानेही डॉ. विखेंना राजशिष्टाचाराचा आठवण करू दिली नाही.
त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांच्या दर्जा आहे.
असे असतांना खासदार म्हणून डॉ.विखे यांनी राजशिष्टाचार पाळला पाहिजे होता. असे मत बैठकीला उपस्थित असलेल्यांनी व्यक्त केले.
- अक्षय तृतीयाच्या आधीच मुंबईकरांसाठी गोड बातमी ! मेट्रोची पिवळी मार्गीका झाली सज्ज; ट्रायल रन सुरु, कसा असणार रूट ? वाचा…
- थोडे दिवस थांबा, वाईट काळही निघून जाणार ; 01 मे 2025 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ‘या’ 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, योजनेच्या नव्या नियमांमुळे अनेकांची अडचण
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘हा’ सहापदरी महामार्ग आठपदरी होणार !
- महापालिकेचा स्थगिती आदेश धाब्यावर! अहिल्यानगरमधील या भागामध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरूच, तक्रारदाराचा उपोषणाचा इशारा