अहमदनगर :- महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून राज्यातील विस्तारक, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्य होणार आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे राज्याच्या प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आमदार स्नेहलता कोल्हे व बाळासाहेब मुरकुटे,
शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, अड. अभय आगरकर, सचिन तांबे, जालिंदर वाकचौरे, प्रकाश चित्ते उपस्थित होते.
- बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?
- …….तर पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांचे अकाउंट बंद केले जाणार ! पैसे सुद्धा काढता येणार नाहीत
- Post Office च्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 11,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- आधारचे किती प्रकार आहेत? UIDAI कडून मिळतात ‘हे’ 4 फॉरमॅट, कुठे कोणता वापरायचा ते जाणून घ्या!
- निसर्गाची बहुगुणी भेट!’हे’ एकच फळ आरोग्य, सौंदर्य आणि अगदी इंधनासाठीही ठरते उपयुक्त