अहमदनगर :- महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून राज्यातील विस्तारक, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्य होणार आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे राज्याच्या प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आमदार स्नेहलता कोल्हे व बाळासाहेब मुरकुटे,
शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, अड. अभय आगरकर, सचिन तांबे, जालिंदर वाकचौरे, प्रकाश चित्ते उपस्थित होते.
- NIACL Apprentice Job 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 500 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
- मिडल क्लास लोकांसाठी जिओ ने लॉन्च केला लै भारी प्लॅन ! ३ महिने डेटा, कॉलिंग आणि Disney+Hotstar फ्री
- Vastu Tips : तुमच्या घरातील ह्या ५ गोष्टी चुकूनही दान करू नका नाहीतर लक्ष्मी घर सोडून जाईल
- देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार तब्बल बारा हजार लोकांनी घेतली, केला विक्रम
- गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौकातील ड्रेनेज लाईन कामासाठी १० दिवस वाहतुकीच्या मार्गात बदल रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकात १५० झाडे लावणार