अहमदनगर :- ‘राज्यात कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी ७३ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच प्रसन्ना कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे’, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात कांदा अनुदान वितरित केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील ९२ हजार ५८७ पात्र लाभार्थींनी बाजार समितीत संपर्क साधावा. बाजार समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्रे द्यावीत.
अनुदान वितरण बँकेमार्फत केले जात असून या बँकेचे प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. अनुदानाबाबत काही अडचणी असल्यास या प्रतिनिधींच्या टीमशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी बाजार समित्यांमध्ये १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कांदाविक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील हे अनुदान आहे. यामध्ये राज्यातील ३ लाख ९३ हजार ३१७ लाभार्थींना ३८७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
- त्रिमूर्तीचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांचे निधन
- महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा ! राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार ! जून महिन्यात मिळणार अधिकचा पगार
- आकाशातही तयार होऊ शकतात बर्फाचे ढग ?शास्त्रज्ञांनी उलगडलं अद्भुत रहस्य
- ‘या’ पक्षाचा आवाज ऐकूनच थरथरतात लोक, घराच्या छतावर दिसल्यास मानलं जातं अशुभ! काय आहे यामागील कारण?