नेवासा – दुष्काळ हटलाच नसल्याने कुकाणा परिसरातील उभी पिके पाऊस व पाटपाण्याअभावी संकटात सापडली असून, खरिपाची पिके या आठवड्यात माना टाकू लागली आहेत.
पाटबंधारे विभागाने पाटपाण्याचे योग्य नियोजन केल्यास उभ्या शेतपिकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सुरू असलेले आवर्तन गांभिर्याने घ्यावे, असे आवाहन कुकाण्यातील समता पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग यांनी केले आहे.

कुकाण्यासह परिसरातील देवगाव, देडगाव, तेलकुडगाव, जेऊरहैबती,तरवडी, वडुले, वाकडी, शिरसगाव, चिलेखनवाडी, आंतरवाली, देवसडे, पाथरवाला, सुलतानपूर, सुकळी, नांदूर शिकारीसह लगतच्या शिवारातील पिके पाटपाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पिकांना या दोन-तीन दिवसात पाटपाणी न मिळाल्यास उभी पिके जळण्याची शक्यता आहे. विहिरींना पाणी वाढेल, असा एकही दमदार पाऊस कुकाणा परिसरात अजून झालेला नाही.पिकांचा भरवसा पाटपाण्यावरच आहे
मात्र, आता पाटपाण्याचे नियोजनच महत्वाचे आहे. पाऊसही नाही आणि पाटपाणीही नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कापूस, बाजरी, मका पिके जोमात आहेत. परंतु या पिकांना त्वरित पाण्याची गरज आहे.
कुकाणा परिसरात अजूनही दुष्काळीच परिस्थिती आहे. मुळा धरण भरले असले तरी पिकांना लगेचच पाटपाणी मिळेल याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे उभी पिके हातातून जातात की काय याच चिंतेत शेतकरी आहेत, असेही श्री. अभंग यांनी म्हटले आहे.
- काय सांगता ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ धबधब्यावर झालंय सलमान खानच्या सुपरहिट गाण्याच शूटिंग, कोणता आहे हा धबधबा?
- तृप्ती देसाईंच्या आरोपांनंतर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी देसाईंच्या विरोधात बदनामीचा गुन्हा केला दाखल!
- शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतरही पुणतांबा येथे विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक, बससेवा सुरू करण्याची मागणी
- अहिल्यानगरमध्ये शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी पडकलं, पाच दिवसाची पोलीस कोठडी
- साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार !