अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज घेतला हा महत्वाचा निर्णय !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पगार जमा होणारे सर्व पगारदार खातेदारांसाठी बँक वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय 

बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळ सभेत घेतला असल्याची माहीती बँकेचे चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन राममदास वाघ व राज्याचे माजी मंत्री व बँकेचे ज्येष्ट संचालक श्री.शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये जिल्हयातील शासकीय, निमशासकीय अशा पगारदार नोकरांची मोठया प्रमाणावर पगाराची खाते आहेत.या खातेदारांना बँकेमार्फत वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असुन याबाबत लवकरच विमा कंपन्याशी चर्चा करून

या खातेदारांना विमा पॉलिसी लागू करणार असुन बँकेने पगारदार नोकरांसाठी वैयक्तीक गृह कर्ज योजने अंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत रू.२५ लाख व मोठया ग्रामपंचायत हद्दीत रू.१५ लाखापर्यतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तसेच त्यांना व्यक्तीगत वापरासाठी दुचाकी व चारचाकी वाहन कर्ज ही बँकेकडून उपलब्ध करून देत असल्याची माहीती बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News