कांदा चोरीच्या घटना सुरूच; चोरटयांनी लंपास केला 25 गोण्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील कोरोनाचे संकट कमी होत आहे असे दिसत असताना आता चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोने- चांदी, पैसे अशा घटनांच्या चोरीनंतर आता शेतमालाची देखील चोरी होऊ लागली आहे. कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथील

सुरेश गुलाब सायकर यांच्या शेतातील चाळीतून चोरांनी सुमारे 75 हजार रुपयांचा 25 गोण्या कांदा लंपास केला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.

भाववाढीच्या अपेक्षेने सायकर यांनी हा कांदा वखारीत साठवून ठेवला होता. चोरांनी वखार फोडून, त्यातील तब्बल 25 गोण्या कांदा लंपास केला. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत अंदाजे 70 ते 75 हजार रुपये एवढी आहे.

शेतमालाच्या चोरीचा हा “पॅटर्न’ शेतकऱ्यांना हादरा देणारा आहे. लॉकडाउन, बाजारभाव, अतिवृष्टीमुळे भरडून निघालेला शेतकरी अशा घटनांमुळे नुकसानीच्या खाईत जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News