महामार्गावरील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती अखेर सुरु

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते.

अखेर आज शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. शहरातून जाणार्‍या हायवेवरील खड्ड्यांचे पॅचिंगचे काम पीडब्ल्यूडीने सुरू केले आहे.

आठ दिवसांत हे काम संपेल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी रस्ते पॅचिंगच्या कामाची पाहणी केली.

जोरदार पावसामुळे शहरातील हायवे उखडले गेले आहेत. खड्ड्यांची चाळण झालेले रस्ते दुरूस्त करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राजगुरू आणि गायकवाड यांना सोबत घेत रस्त्याची पाहणीही केली होती. आज गुरूवार सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने औरंगाबाद-नगर-पुणे रोडवरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे.

रस्त्याची स्वच्छता, दुभाजक दुरूस्ती, दिशादर्शक फलक, अपघातरोधक उपाययोजना करण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण केले जाईल अशी माहिती राजगुरू यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News