नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह तीन राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाची आज गुरुवारी यासंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. . प्रथम महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये, तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूक दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात नव्या सरकारची स्थापना झालेली असेल. महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८, हरियाणातील ९० आणि झारखंडमधील ८२ जागांवर वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्र व हरियाणात २० सप्टेंबर रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.
१५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी निकालांची घोषणा करण्यात आली होती. तर नक्षलग्रस्त झारखंडमध्ये २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान पाच टप्प्यांत मतदान झाले होते. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यांत भाजपने सत्ता मिळवली होती.
- 1 जानेवारी 2026 पासून ‘हे’ 6 नियम चेंज होणार ! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार ?
- महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातुन जाणारा आणखी एक महत्वाचा महामार्ग चौपदरी होणार ! 3 जिल्ह्यांना होणार फायदा, वाचा सविस्तर
- पुण्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! 24 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग सुरू होणार, आता शहरातील ‘हा’ भाग पण मेट्रोच्या नकाशावर
- शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! एक जानेवारी 2026 आधी ‘हे’ काम करावे लागणार, वाचा सविस्तर
- 6 लाखाच्या आत Car शोधताय ? ‘ही’ हॅचबॅक ठरणार तुमच्यासाठी फायदेशीर, भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार!