नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह तीन राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाची आज गुरुवारी यासंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. . प्रथम महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये, तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूक दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात नव्या सरकारची स्थापना झालेली असेल. महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८, हरियाणातील ९० आणि झारखंडमधील ८२ जागांवर वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्र व हरियाणात २० सप्टेंबर रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.
१५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी निकालांची घोषणा करण्यात आली होती. तर नक्षलग्रस्त झारखंडमध्ये २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान पाच टप्प्यांत मतदान झाले होते. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यांत भाजपने सत्ता मिळवली होती.
- 12 तासांचा प्रवास आता 7 तासात होणार! महाराष्ट्रात धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! नव्या आठव्या वेतन आयोगात परफॉर्मन्स बेस्ड फॉर्म्युला लागू होणार? कसा असणार नवा फॉर्म्युला?
- ठरलं ! देशातील पहिली Vande Bharat Sleeper Train ‘या’ मार्गावर धावणार, कसा असणार रूट?
- नोव्हेंबर महिन्याच्या ‘या’ तारखेला सुट्टी नसतांनाही महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद राहणार ! कारण काय?
- पुण्यातील ‘या’ पॉश परिसरात फक्त 28 लाखात मिळणार घर ! Mhada कडून पुणेकरांना मिळणार मोठी भेट













